गस्तीच्या 16 बोटी किना:यावर पडून!
By Admin | Updated: June 29, 2014 01:12 IST2014-06-29T01:12:28+5:302014-06-29T01:12:28+5:30
राज्यात किना:यावर रोज गस्तीसाठी 3,क्35 बोटींचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिका:यांकडून देण्यात आली.

गस्तीच्या 16 बोटी किना:यावर पडून!
>जमीर काझी - मुंबई
‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा सक्षम केल्याचा गवगवा राज्य सरकारकडून केला जात असला तरी तो ‘मोठा वाडा पोकळ वासा’ ठरत असल्याची परिस्थिती गृहखात्याच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. सागरी गस्तीसाठीच्या तब्बल 16 बोटी नादुरुस्त असून गेल्या 2 महिन्यांपासून किना:यावर पडून आहेत. त्याचा भार उर्वरित बोटींवर पडल्याने अतिवापरामुळे त्यांतही बिघाड होण्याची शक्यता आहे. राज्यात किना:यावर रोज गस्तीसाठी 3,क्35 बोटींचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिका:यांकडून देण्यात आली.
राज्याला 57क् किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरीकिनारा लाभलेला असून त्यापैकी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची किनारपट्टी 114 किमीची आहे. ‘26/11’च्या हल्ल्यासाठी अतिरेक्यांनी या मार्गाद्वारे शहरात प्रवेश केला होता. त्यानंतर सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखून 6 जिल्ह्यांमध्ये नवीन 12 पोलीस ठाणी स्थापण्यात आली. सध्या एकूण 37 सागरी पोलीस ठाणी असून या ठिकाणी 91 तपासणी नाके कार्यरत आहेत. या ठिकाणी गस्तीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्व सुविधायुक्त 57 अद्ययावत बोटी स्वतंत्र पुरवल्या आहे.
गृह विभागातील एका वरिष्ठ अधिका:याकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राच्या 12 व 5 टन वजनाच्या एकूण 28 बोटी असून त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केंद्राने परस्पर गोव्याच्या शिपयार्ड कंपनीकडे सोपवली आहे. त्यासाठी 3 वर्षाचा करार झालेला आहे.
राज्य सरकारच्या 12 मीटर लांबीच्या 7 तर 9.5 मीटर लांबीच्या 22 बोटी असून त्यांची जबाबदारी मरिन फंट्रियर्स कंपनीकडे होती. त्याबाबतचा 4 महिन्यांचा करार गेल्या 16 मे रोजी संपला असून नव्याने 3 वर्षाचा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याबाबतची कार्यवाही रखडलेली आहे. केंद्र व राज्याच्या बोटीशिवाय जुन्या 15 बोटींचा समावेश असून त्याव्यतिरिक्त मुंबई पोलिसांकडे 4 सिलेग्स बोटी आहेत. जुन्या बोटींची दुरुस्तीची जबाबदारी मोटार परिवहन विभागाकडून (एमटी) केली जाते. मात्र, त्यांच्याकडील 3 बोटींची अवस्था दुरुस्तीच्या पलीकडे असल्याने त्या बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हानिहाय नादुरुस्त बोटींची नावे
जिल्हाकेंद्राच्या बोटीराज्य बोटीजुन्या बोटी
मुंबईभीमा, कावेरी, पूर्णामुंबई-5, मुंबई-9इंद्रायणी
नवी मुंबईपाताळगंगा, शक्तीतरंग-
ठाणो ग्रामीणशौर्य-प्राणहिता
रायगडकुलाबा, सावित्री-वशिष्टी
र}ागिरी-र}ागिरी-2-
सिंधुदुर्ग-सिंधुदुर्ग-2-
किना:यांवर 72 बोटींची नजर
सध्या राज्य पोलिसांकडे सागरी तटाच्या रक्षणासाठी एकूण 72 बोटी आहेत. मात्र, केंद्राच्या 8, राज्याच्या 5 व जुन्या 3 बोटी नादुरुस्त आहेत. त्याचे प्रमाण कमी-अधिक होत रोज सरासरी 32, 35 बोटींचा गस्तीसाठी वापर केला जात आहे. देखभालीच्या जबाबदारीचा निर्णय त्वरित न झाल्यास त्यांची संख्या आणखी खालावण्याची भीती अधिका:यांकडून वर्तवण्यात आली.
मुंबई - ठाण्यातील
11 बोटी नादुरुस्त
विशेष म्हणजे अतिरेक्यांकडून धोका असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणो जिल्ह्यातील 11 बोटींमध्ये बिघाड झालेला आहे. त्यामध्ये केंद्राच्या 8 बोटींचा समावेश असून राज्य शासनाच्या (मरिन फ्रंटियर्स) बोटींचा देखभाल व दुरुस्ती करार दीड महिन्यापूर्वी संपलेला असून अद्याप नवा करार झालेला नाही. किना:यावर पडून असलेल्या काही बोटींचा स्टार्ट बोर्ड बिघडला आहे, तर काहींचे गिअर बॉक्स, काही गिअर ऑइलगळतीमुळे बंद पडल्या असल्याचे समजते.