शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल, श्रीगोंदा येथून सुरूवात तर नाशिकला समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 18:49 IST

विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे.

मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. सात दिवसांच्या या झंझावती दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यात 21 सभा होणार असून दहा मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील या दौर्‍याचा समारोप होणार आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबर महिन्यापासून राज्यभरात हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे. 1 ते 11 डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा केल्यानंतर जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दहा दिवसात 27 सभांनी संपुर्ण मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पिंजुन काढला होता. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात आपले हे आंदोलन सुरू केले असून, त्याचा शुभारंभ गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथुन सुरू होत आहे. 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या सात दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 21 सभा होणार असून, समारोप नाशिक येथे 10 मार्च रोजी होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अरूण गुजराती, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक, विद्यार्थी, विविध आघाड्यांचे प्रमुख आमदार, खासदार, सेलचे प्रमुख व पक्षाचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. 

गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीगोंदा, दुपारी 4 वाजता शेवगांव, सायंकाळी 7.30 वाजता राहुरी, शुक्रवार दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अकोले, सायंकाळी 4 वाजता कोपरगांव, सायंकाळी 7 वाजता येवला, शनिवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निफाड, दुपारी 2 वाजता दिंडोरी, सायंकाळी 5 वाजता कळवण, रविवार दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता साटाणा, सायंकाळी 4 वाजता नवापुर, सायंकाळी 7 वाजता शहादा, सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर, दुपारी 3 वाजता चोपडा, सायंकाळी 6 वाजता पारोळा, मंगळवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रावेर, दुपारी 3 वाजता बोदवड, सायंकाळी 6.30 वाजता जामनेर, बुधवार दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता धरणगांव, दुपारी 3 वाजता पाचोरा व सायंकाळी 7 वाजता चाळीसगांव येथे जाहिर सभा होणार आहेत. 

राज्यातील शेतकर्‍यांना जाहिर कर्जमाफीचा अद्याप न मिळालेला लाभ, बोंडअळी, तुडतुड्या रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, दोन दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीचे झालेले नुकसान, वाढती महागाई, बेरोजगार, युवकांचे प्रश्न राज्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, उत्तर महाराष्ट्रातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी मांडणार आहेत. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस