शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:18 IST

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती.

नागपूर : शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला. विविध तणावांमुळे लॉकडाऊनच्या दोन महिन्यातच अमरावती विभागातील १५१ शेतकºयांनी आत्महत्या केली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यातच अमरावती विभागात १५१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यातील १९ प्रकरणे नियमानुसार मदतीसाठी पात्र ठरली तर ३६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ११ प्रकरणांतच आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली. दरम्यान, जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागातील ३८७ शेतकºयांनी आत्महत्या केली.यवतमाळमध्ये सर्वाधिक संख्यालॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त ५४ शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. तर अमरावतीमध्ये ही संख्या ४० इतकी होती. अकोल्यामध्ये सर्वात कमी १३ आत्महत्या नोंदविण्यात आल्या.४१ महिन्यांत साडेतीनहजारांहून अधिक आत्महत्यादरम्यान, २०१७ ते मे २०२० या कालावधीत विभागात एकूण ३ हजार ५५८ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील १ हजार ७५० म्हणजेच ४९.१८ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. तर प्रत्यक्षात त्यातील १ हजार ६५७ शेतकºयांच्या कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या