शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:18 IST

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती.

नागपूर : शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला. विविध तणावांमुळे लॉकडाऊनच्या दोन महिन्यातच अमरावती विभागातील १५१ शेतकºयांनी आत्महत्या केली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यातच अमरावती विभागात १५१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यातील १९ प्रकरणे नियमानुसार मदतीसाठी पात्र ठरली तर ३६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ११ प्रकरणांतच आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली. दरम्यान, जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागातील ३८७ शेतकºयांनी आत्महत्या केली.यवतमाळमध्ये सर्वाधिक संख्यालॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त ५४ शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. तर अमरावतीमध्ये ही संख्या ४० इतकी होती. अकोल्यामध्ये सर्वात कमी १३ आत्महत्या नोंदविण्यात आल्या.४१ महिन्यांत साडेतीनहजारांहून अधिक आत्महत्यादरम्यान, २०१७ ते मे २०२० या कालावधीत विभागात एकूण ३ हजार ५५८ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील १ हजार ७५० म्हणजेच ४९.१८ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. तर प्रत्यक्षात त्यातील १ हजार ६५७ शेतकºयांच्या कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या