शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

महिलांना १५००, तीन सिलिंडर फ्री... एवढा पैसा कुठून येणार? अजित पवारांनी सांगितला सोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 17:14 IST

Ajit pawar News: अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांनी टीका करत एवढा पैसा कुठून येणार असा सवाल राज्यसरकारवर उपस्थित केला होता.

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांनी टीका करत एवढा पैसा कुठून येणार असा सवाल राज्यसरकारवर उपस्थित केला. यावर पवारांनी पत्रकार परिषदेत हा पैसा कुठून येणार, कसा येणार याचा हिशेब मांडत, आम्ही काही नवखे नाही असे सांगत विरोधकांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही वीज माफी सह अन्य फायदे दिले जाणार आहे. तसेच तरुणांना अप्रेंटीस करत असताना वर्षभर १०००० रुपये दिले जाणार आहेत. अशा अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. यावरून विरोधकांनी हा निवडणुकीचा अर्थसंकल्प असल्याचे व या योजना ताप्तुरत्या राबविल्या जाणार असल्याची टीका केली. 

यावर अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची आमची क्षमता असल्याचे म्हणत हा पैसा कुठून येणार याचामार्ग सांगितला. यासाठी जीएसटीतून राज्याला मिळणारा महसूल वापरण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. दरवर्षी जीएसटीचा महसूल ५० ते ६० हजार कोटींना वाढत आहे. यंदा राज्याला २.२० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच केंद्राला जो जीएसटी जातो त्याच्या ५० टक्के जीएसटी राज्यांना परत केला जातो. केंद्राला मिळणाऱ्या एकूण जीएसटीपैकी १६ टक्के वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. सुमारे तीन लाख कोटी रुपये केंद्राला जातात त्याच्या निम्मे आपल्याला मिळणार आहेत, असे अजित पवारांनी सांगितले. 

याचबरोबर इतर करही आहेत. आजच्या अर्थसंकल्पातील आकडा कमी वाटत असला तरी येत्या सात तारखेला मी पुरवणी मागण्यांद्वारे उर्वरित रक्कम मांडणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबई विभागातील पेट्रोल डिझेल दर कमी केल्यावरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. या भागातील लोकांची गेल्या काही काळापासून ही मागणी होती. त्यांना उर्वरित राज्यापेक्षा जास्त कर आकारला जात होता. यामुळे हा कर कमी करून राज्यातील दरांच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा विचार आमच्या मनात सुरु होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. तरुणींना राज्य सरकार ५० टक्के फी माफ देत होते. परंतू अर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांनी चांगले शिक्षण घ्यायचे नाही का, असा सवाल करत अजित पवारांनी या मुलींनाही मदत देत असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा