शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार'; अंजली दमानियांनी खुलासा केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:03 IST

योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही १५ तारखेला येणार आहे. स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. तरीही चौकशी नाही- अंजली दमानिया.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल, भाजपासोबत जाणार अशा चर्चा होत होत्या. त्यानंतर अजित पवारांनी समोर येत स्पष्टीकरण दिले होते. आता पुन्हा अंजली दमानिया यांनी '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार' असे ट्विट केल्याने चर्चा सुरु झाली होती. यावर अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानियांनी सांगितले. 

आपण सारेच बघतोय आज महाराष्ट्रातील बँकेचा घोटाळा बाहेर काढला जातोय. जरंडेश्वरवर कारवाई होतेय. आजचीच बातमी पाहिली तर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे नाव जरंडेश्वर चौकशीतून वगळण्यात आले. दोन कंपन्या गुरु कमोडिटीज व स्पार्कलिंग सॉईल आहेत. यापैकी स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. असे असूनदेखील त्यांची चौकशी न होणे आणि नाव वगळणे हे सगळे एक प्रकारचा दबाव बनवायचे आणि विरोधी पक्षातील जे कोणी असतील त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे ही भाजपाची स्ट्रॅटेजी राहिली आहे, असा आरोप दमानिया यांनी केला. 

भाजपाची वॉशिंग मशिन असे लोक म्हणतात. भाजपा ईडीचा यासाठी सर्रास गैरवापर करत आहे. हे सगळे मुद्दे जोडले तर ईडीची चौकशी, चार्जशीट फाईल होणे, दोघांना वगळले जाणे व योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही १५ तारखेला येणार आहे. पत्रकारांनी सांगितल्यानंतर मी जेव्हा रात्री घरी आले तेव्हा मी विचार करत बसले. हे सर्व किळसवाणे, अतिशय राग येतोय हे राजकारण पाहून. कुठेतरी हे सगळे बंद झाले पाहिजे असे वाटते. हे बंद करणार तरी कोण कारण आता सगळेच पक्ष एका माळेचे मणी आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.  

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा