शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम, सरकार टिकावे म्हणून कोर्टात प्रयत्न करता, तसे आरक्षणासाठी करा - विनोद पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 07:18 IST

Maratha Reservation: सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात  जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले.

औरंगाबाद : सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात  जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले. मराठा आरक्षणसंदर्भात १५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा निर्णायक आंदोलनाला सरकारला सामोरे जावे  लागेल, असा थेट इशारा दिला. 

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक व कार्यकर्त्यांची  गुरुवारी बैठक झाली. तीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना  विनोद पाटील म्हणाले की,  आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे मराठा आरक्षणाविषयी नव्याने प्रक्रिया सुरू करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार का? दुसरा पर्याय सरकार सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात रिव्ह्यू पिटीशन करणार आहे का? यापैकी एक भूमिका सरकारला जाहीर करावी लागेल. यापूर्वी समाजाने रस्त्यावरील लढा दिला व न्यायालयात कायदेशीर लढा दिला आहे. पुढचा लढा यापेक्षा वेगळाच असेल, असे सांगून त्यावर सविस्तर बोलणे त्यांनी टाळले.

मराठा मोर्चे निघाले तेव्हा ते लीडरलेस होते, असे सांगून विनोद पाटील म्हणाले की, यापुढेही आमच्या लढ्याला कोणताही चेहरा नसेल.  अग्रभागी समाजातील  महिला व  ज्येष्ठ नागरिक असतील. अशा नागरिकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यास जाणार आहे. ते आमची अस्मिता संभाजीराजे यांचे नेतृत्व आपण मानता का, असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, ते राजगादीचे वारस आहेत व आमची अस्मिता असून प्रेरणादायी आहेत. ते नेतृत्वाच्याही वर आहेत, असे सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे नेतृत्व मानण्यास नकार दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र