शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

राज्यात १५ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; नाॅनकोविड सेवांचा ताण वाढल्याने रक्त तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:50 IST

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई :

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, यामुळे राज्यात रक्तसाठ्याची मागणी दिवसागणिक वाढत असून, सध्या केवळ १५ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे.

राज्यात ४९,४९५ तर मुंबईत ७,०१२ रक्त पिशव्या (युनिट) उपलब्ध असल्याने, हा रक्तसाठा पुढील १२ ते १५ पुरेल इतका असल्याने सामान्य नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर मुंबईसह राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचार करीत लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्ताची मागणी वाढली असून, लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सोसायटी, विद्यार्थी व कर्मचारी यांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी