शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवस चालणारी वारी दोन दिवसांतच आटोपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:12 IST

आषाढी वारी सोहळा; नोकरी, व्यवसायानिमित्त वारकरी थांबेनात !

ठळक मुद्देसावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळा व दिंड्यांसमवेत पंढरीतपूर्वी आषाढी सोहळा झाल्यानंतर वारकरी राहुट्या किंवा मोकळ्या मैदानात विविध महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भारुड ऐकण्यात दंग आषाढी सोहळ्यादिवशी पदस्पर्श दर्शन नव्हे तर मुखदर्शन, नामदेव पायरी किंवा कळस दर्शन घेऊन अनेक भाविक परत

पंढरपूर : पूर्वी आषाढी वारी सोहळा हा १० ते १५ दिवस चालायचा, मात्र कालानुरुप त्यात बदल होत गेले आणि हा सोहळा केवळ दोन ते तीन दिवसांवर आला आहे़ कारण नोकरी, व्यवसायामुळे भाविकांना इतके दिवस थांबणे कठीण झाले़ त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन झाले की, ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’ असे म्हणत वारकरी निघून जात असल्याचे दिसून आले.

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळा व दिंड्यांसमवेत पंढरीत येतात. पूर्वी आषाढी सोहळा झाल्यानंतर वारकरी राहुट्या किंवा मोकळ्या मैदानात विविध महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भारुड ऐकण्यात दंग होऊन जात असत, शिवाय पांडुरंगाच्या या वैकुंठभूमीत राहण्याची संधी यानिमित्ताने मिळत असल्याने भाविक याच ठिकाणी दहा ते पंधरा दिवस राहायचे. ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक संकटांशी सामना करीत पंढरपुरात राहत, असे कोल्हापूरचे विजय कदम सांगत होते.‘आषाढीला पाठ देऊन जाऊ नये’ असे पूर्वी म्हटले जायचे, त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यादिवशी एकही वारकरी परतीच्या प्रवासाला जात नव्हता़. यंदा याउलट चित्र दिसून आले़ कारण, आषाढी सोहळ्यादिवशी पदस्पर्श दर्शन नव्हे तर मुखदर्शन, नामदेव पायरी किंवा कळस दर्शन घेऊन अनेक भाविक परत गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील कराड नाका, सांगोला चौक या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होण्याची समस्या अनेकांना अनुभवावी लागली. 

बीडचे भाविक सुदाम कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, माउली, आता कुणालाही वेळ नाही़ जो-तो आपापल्या कामात व्यस्त असतो़ नोकरी, व्यवसाय करणाºयांचे तर काही खरे नाही़ एक-दोन दिवसाची सुट्टी घेऊन ते आलेले असतात. त्यामुळे पांडुरंगाची वारी पोहोच करून ते लगेच निघून जातात, असे त्यांनी सांगितले.

यावर्षी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले होते, मात्र आषाढीदिवशीच निम्म्यापेक्षा जास्त वारी रिकामी झाली़ काही भाविक ६५ एकर परिसरात होते़ मात्र ते दोन दिवसांनी निघून गेले़ मंगळवारी गोपाळकाला असल्याने लाख ते दीड लाखच भाविक पंढरीत आहेत़ असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे़ गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतील़ त्यानंतर पंढरपुरातील गर्दी कमी होईल़

सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम

  • - पूर्वी आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले की जोरदार पाऊस पडत होता़ तशा वातावरणातही वारकरी मजल दरमजल करत वारीसाठी येत होता़ कारण पावसाळा भरपूर असल्याने बहुसंख्य शेतकरी खरिपाची पेरणी उरकून आनंदाने पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी येत होता़ शिवाय पूर्वी बैलगाडी हे वाहतुकीचे माध्यम होते़ सध्या वाहनांची उपलब्धता झाली आहे़ त्यामुळे भाविक दर्शन झाले की लगेच गावी निघून जातात़ हे सर्व सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम असल्याचे जालन्याचे संपत मुळे यांनी सांगितले़
टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी