शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

१५ दिवस चालणारी वारी दोन दिवसांतच आटोपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:12 IST

आषाढी वारी सोहळा; नोकरी, व्यवसायानिमित्त वारकरी थांबेनात !

ठळक मुद्देसावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळा व दिंड्यांसमवेत पंढरीतपूर्वी आषाढी सोहळा झाल्यानंतर वारकरी राहुट्या किंवा मोकळ्या मैदानात विविध महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भारुड ऐकण्यात दंग आषाढी सोहळ्यादिवशी पदस्पर्श दर्शन नव्हे तर मुखदर्शन, नामदेव पायरी किंवा कळस दर्शन घेऊन अनेक भाविक परत

पंढरपूर : पूर्वी आषाढी वारी सोहळा हा १० ते १५ दिवस चालायचा, मात्र कालानुरुप त्यात बदल होत गेले आणि हा सोहळा केवळ दोन ते तीन दिवसांवर आला आहे़ कारण नोकरी, व्यवसायामुळे भाविकांना इतके दिवस थांबणे कठीण झाले़ त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन झाले की, ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’ असे म्हणत वारकरी निघून जात असल्याचे दिसून आले.

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळा व दिंड्यांसमवेत पंढरीत येतात. पूर्वी आषाढी सोहळा झाल्यानंतर वारकरी राहुट्या किंवा मोकळ्या मैदानात विविध महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भारुड ऐकण्यात दंग होऊन जात असत, शिवाय पांडुरंगाच्या या वैकुंठभूमीत राहण्याची संधी यानिमित्ताने मिळत असल्याने भाविक याच ठिकाणी दहा ते पंधरा दिवस राहायचे. ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक संकटांशी सामना करीत पंढरपुरात राहत, असे कोल्हापूरचे विजय कदम सांगत होते.‘आषाढीला पाठ देऊन जाऊ नये’ असे पूर्वी म्हटले जायचे, त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यादिवशी एकही वारकरी परतीच्या प्रवासाला जात नव्हता़. यंदा याउलट चित्र दिसून आले़ कारण, आषाढी सोहळ्यादिवशी पदस्पर्श दर्शन नव्हे तर मुखदर्शन, नामदेव पायरी किंवा कळस दर्शन घेऊन अनेक भाविक परत गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील कराड नाका, सांगोला चौक या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होण्याची समस्या अनेकांना अनुभवावी लागली. 

बीडचे भाविक सुदाम कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, माउली, आता कुणालाही वेळ नाही़ जो-तो आपापल्या कामात व्यस्त असतो़ नोकरी, व्यवसाय करणाºयांचे तर काही खरे नाही़ एक-दोन दिवसाची सुट्टी घेऊन ते आलेले असतात. त्यामुळे पांडुरंगाची वारी पोहोच करून ते लगेच निघून जातात, असे त्यांनी सांगितले.

यावर्षी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले होते, मात्र आषाढीदिवशीच निम्म्यापेक्षा जास्त वारी रिकामी झाली़ काही भाविक ६५ एकर परिसरात होते़ मात्र ते दोन दिवसांनी निघून गेले़ मंगळवारी गोपाळकाला असल्याने लाख ते दीड लाखच भाविक पंढरीत आहेत़ असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे़ गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतील़ त्यानंतर पंढरपुरातील गर्दी कमी होईल़

सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम

  • - पूर्वी आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले की जोरदार पाऊस पडत होता़ तशा वातावरणातही वारकरी मजल दरमजल करत वारीसाठी येत होता़ कारण पावसाळा भरपूर असल्याने बहुसंख्य शेतकरी खरिपाची पेरणी उरकून आनंदाने पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी येत होता़ शिवाय पूर्वी बैलगाडी हे वाहतुकीचे माध्यम होते़ सध्या वाहनांची उपलब्धता झाली आहे़ त्यामुळे भाविक दर्शन झाले की लगेच गावी निघून जातात़ हे सर्व सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम असल्याचे जालन्याचे संपत मुळे यांनी सांगितले़
टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी