शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

१४ हजार कोटींचा निधी पळविला, अनुसूचित जातींच्या कल्याणाकडे दुर्लक्ष

By यदू जोशी | Updated: December 20, 2020 06:51 IST

Scheduled Castes : सरकार आघाडीचे असो की भाजपचे अनेक वर्षांपासूनच्या आकडेवारीचा त्यास भक्कम आधार असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेली आकडेवारी ही सोनिया गांधींनी मांडलेल्या व्यथेला दुजोरा देणारी आहे.

- यदु जोशी

मुंबई : अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय निधीचा पुरेपूर वापर होत नाही, ही खंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.सरकार आघाडीचे असो की भाजपचे अनेक वर्षांपासूनच्या आकडेवारीचा त्यास भक्कम आधार असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेली आकडेवारी ही सोनिया गांधींनी मांडलेल्या व्यथेला दुजोरा देणारी आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतानाही सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर अन्य विभागांनी डल्ला मारला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूद या विभागासाठी करण्यात आली होती. त्यातील २२ हजार २६८ कोटी रुपये खर्च झाले आणि १४ हजार १९८ कोटी रुपये अखर्चित राहून अन्य विभागांना दिले गेले. त्याआधीच्या आघाडी सरकारच्या काळातही पळविलेल्या निधीची आकडेवारी अशीच मोठी होती.यंदा या विभागाच्या निधीवर कोरोनामुळे वेगळेच संकट आले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात या विभागासाठी ९,३०० कोेटी रुपयांची तरतूद करण्यात आली.मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वच विभागांनी तरतुदीच्या केवळ ३३ टक्केच निधी खर्च करावा, असे बंधन वित्त विभागाने टाकले. त्याचा मोठा फटका सामाजिक न्याय विभागाला बसला. ९,३०० कोटी रुपयांपैकी केवळ ३ हजार कोटी रुपये आतापर्यंत विभागाला मिळाले. परवा विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये आणखी २,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. याचा अर्थ ९,३०० कोटी रुपयांपैकी चालू आर्थिक वर्षात ५ हजार ४०० कोटी रुपयेच विभागाला मिळणार आहेत. याचा अर्थ ४,१०० कोटी रुपयांचा कट लागेल. २०१९-२० च्या वार्षिक अर्थसंकल्पात फडणवीस सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. प्रत्येक विभागाच्या तरतुदीला ३० टक्के कट लावण्यात आला. त्यामुळे नव्या सरकारनेही विभागाच्या तरतुदीस जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा कट लावला होता.

सोनिया गांधींच्या पत्रातील व्यथेला दुजोरा-  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील व्यथेला आकडेवारीमुळे दुजाेरा मिळाला. -  गेली २० वर्षे अनुसूचित जातींच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी गेली दोन-अडीच दशके अखर्चित ठेवून अन्य खात्यांकडे वळविण्यात आला. - त्यावर अनेक संघटनांनी अनेकदा ओरड केली, वृत्तपत्रांनीही लिहिले; पण, निधीची पळवापळवी कायम राहिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी