शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

गडचिरोलीतील १३२ गावांत सौरदिवे मालवले !

By admin | Updated: June 20, 2015 00:18 IST

वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट

गडचिरोली : वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)मार्फत जिल्ह्यात सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. २०११ ते २०१४ या कालावधीत हे काम करण्यात आले. मात्र या दिव्यांची योग्य ती देखभाल ठेवण्यात न आल्याने ते नादुरुस्तावस्थेत आहेत़ परिणामी १३२ गावांतील सौरदिवे मालवले आहेत़ जिल्ह्यात १६६८ महसुली गावे आहेत. यापैकी २६८ गावांत २०११ पर्यंत वीज पोहोचलेली नव्हती. ही बाब आर. आर. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पहिल्याच आढावा बैठकीत जानेवारी २०१० मध्ये याबाबत नाराजी नोंदविली व गावांना प्रकाशमान करण्याचा कार्यक्रम हाती घ्या, अशा सूचना केल्या. त्यानंतर महावितरणने १३६ गावांची विद्युतीकरणासाठी निवड केली. तर १३२ गावे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या दुर्गम व अतिदुर्गम गावात सौरऊर्जेचा कार्यक्रम राबवून येथे विद्युतीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले. या गावांची निवड करण्यासाठी मेडाने ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील व विविध शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही गावे निश्चित करण्यात आली. या गावातील कुटुंबांची संख्या निश्चित करून प्रत्येक घरात सौरऊर्जेची दोन साधने वितरित केली. यामध्ये ३७ वॅटची बॅटरी व दोन सीएफएल लाईट देण्यात आले होते. या १३२ गावांत सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचा कार्यक्रम मेडामार्फत पूर्ण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने पर्यावरण समृद्ध ग्राम योजना, मागास क्षेत्र अनुदान विकास योजना आदी योजनांमधून गावात १० घरांमागे एक सौरऊर्जेचा पथदिवा देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे मेडाने पथदिवे लावले नाही. मात्र, ज्या कुटुंबांना मागील तीन ते चार वर्षांत सौरऊर्जेची साधने वितरित करण्यात आली़ ती नादुरुस्त अवस्थेत आहेत. अनेक गावांत सौरऊर्जेच्या पथदिव्यांची बॅटरी व सौरऊर्जेची प्लेट चोरीला गेलेली आहे. त्यामुळे हे पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत़ एकूणच सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरणाचा प्रयत्न गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या गावांमध्ये फसला, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)कुरखेडा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांतून लावण्यात आलेले सौरऊर्जेचे पथदिवे बंद पडले आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नाही. केवळ दिवे लावून देण्यात आले. त्यामुळे आता अनेक गावांत अंधार आहे. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे.- चांगदेव फाये, पं. स. सदस्य, कुरखेडा