शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

गडचिरोलीतील १३२ गावांत सौरदिवे मालवले !

By admin | Updated: June 20, 2015 00:18 IST

वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट

गडचिरोली : वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)मार्फत जिल्ह्यात सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. २०११ ते २०१४ या कालावधीत हे काम करण्यात आले. मात्र या दिव्यांची योग्य ती देखभाल ठेवण्यात न आल्याने ते नादुरुस्तावस्थेत आहेत़ परिणामी १३२ गावांतील सौरदिवे मालवले आहेत़ जिल्ह्यात १६६८ महसुली गावे आहेत. यापैकी २६८ गावांत २०११ पर्यंत वीज पोहोचलेली नव्हती. ही बाब आर. आर. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पहिल्याच आढावा बैठकीत जानेवारी २०१० मध्ये याबाबत नाराजी नोंदविली व गावांना प्रकाशमान करण्याचा कार्यक्रम हाती घ्या, अशा सूचना केल्या. त्यानंतर महावितरणने १३६ गावांची विद्युतीकरणासाठी निवड केली. तर १३२ गावे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या दुर्गम व अतिदुर्गम गावात सौरऊर्जेचा कार्यक्रम राबवून येथे विद्युतीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले. या गावांची निवड करण्यासाठी मेडाने ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील व विविध शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही गावे निश्चित करण्यात आली. या गावातील कुटुंबांची संख्या निश्चित करून प्रत्येक घरात सौरऊर्जेची दोन साधने वितरित केली. यामध्ये ३७ वॅटची बॅटरी व दोन सीएफएल लाईट देण्यात आले होते. या १३२ गावांत सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचा कार्यक्रम मेडामार्फत पूर्ण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने पर्यावरण समृद्ध ग्राम योजना, मागास क्षेत्र अनुदान विकास योजना आदी योजनांमधून गावात १० घरांमागे एक सौरऊर्जेचा पथदिवा देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे मेडाने पथदिवे लावले नाही. मात्र, ज्या कुटुंबांना मागील तीन ते चार वर्षांत सौरऊर्जेची साधने वितरित करण्यात आली़ ती नादुरुस्त अवस्थेत आहेत. अनेक गावांत सौरऊर्जेच्या पथदिव्यांची बॅटरी व सौरऊर्जेची प्लेट चोरीला गेलेली आहे. त्यामुळे हे पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत़ एकूणच सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरणाचा प्रयत्न गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या गावांमध्ये फसला, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)कुरखेडा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांतून लावण्यात आलेले सौरऊर्जेचे पथदिवे बंद पडले आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नाही. केवळ दिवे लावून देण्यात आले. त्यामुळे आता अनेक गावांत अंधार आहे. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे.- चांगदेव फाये, पं. स. सदस्य, कुरखेडा