शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा सुटेना, वाद पुन्हा उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 22:54 IST

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा अद्यापही सुटण्याचं नाव घेत नाहीये.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा अद्यापही सुटण्याचं नाव घेत नाहीये. हा वाद आता पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. तत्कालिन ठाकरे सरकारनं दिलेली यादी रद्द केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी यचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सरकारच्या वैधतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असं असताना यादी रद्द करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला असा सवाल करण्यात आला आहे.

"सध्या आमदारांचं जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस जे सरकार बनवलं ते योग्य की अयोग्य, कायदेशीर की बेकायदेशील याचा निकाल अजून लागायचं आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे गेलं आहे. जेव्हा मविआ सरकार स्थापन झालं होतं. तेव्हा त्यांना घटनेप्रमाणे १२ नामनिर्देशित आमदारांची यादी राज्यपालांना दिली होती. त्यांनी दोन ते अडीच वर्षांत यावर निर्णय घेतला नाही. परंतु प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना ती यादी रद्द करण्याची किंवा आपण ती मागे घेतो असं पत्र दिलं. त्यावर राज्यपालांनीही निर्णय घेतला," असं सातपुते म्हणाले.

“राज्यातील सरकार कायदेशीर अथवा बेकायदेशीर आहे का हा पहिला मु्द्दा येतो. याचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. जर निर्णय विरोधात गेला तर मागे घेतलेल्या यादीचं काय असा प्रश्न निर्माण होतो. जर न्यायालयानं हे सरकार वैध असल्याचा निर्णय दिला तर राज्यपालांच्या या निर्णयाला काही अर्थ राहतो. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल असताना यापूर्वीच्या काही निकालांचा विचार करता मविआनं दिलेली यादी पुनर्स्थापित करण्यात यावी, जेव्हा हा निकाल लागेल तेव्हा या यादीचं काय करता येईल ते पाहता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे