शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:07 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही.

अमरावती, दि. 4 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही. मुळात बालमृत्यू रोखण्यासाठी वरवरची मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.आदिवासीबहूल मेळघाट क्षेत्रात सनन १९९६ ते २०१७ या कालावधीत ११ हजार ४३६ बालमृत्यू ( उपजतमृत्यू व बालमृत्यू) झालेत. म्हणजेच वर्षाकाठी सरासरी ५१९ बालमृत्यू होत आहेत. यासोबतच मातामृत्यू देखील होत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. मेळघाटातील कोवळ्या पानगळीचे कारण समजून घेण्यासाठी सन १९९३ पासून मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती, आरोग्यमंत्री, सरसंघचालक, सोनिया गांधी यांच्यासह अनेक समिती प्रमुखांचे दौरे झालेत.मागील २३ वर्षांपासून मुंबई व नागपूरच्या उच्च न्यायालयात जनहित याचिकांवर सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास अद्यापही संपलेला नाही. यावर काम करणारे अभियोक्ता अद्यापही मेळघाटात येऊन बालमृत्युची कारणे समजून घेऊ शकलेले नाहीत. कालचे विरोधक आणि आजच्या शासनकर्त्यांनी त्याकाळात मेळघाटातील बालमृत्यूचा प्रश्न सातत्याने पेटता ठेवला. आज मात्र त्यांना या भीषण वास्तवाचा विसर पडला. मेळघाटातील ‘खोज’ संस्थेने हा प्रश्न न्यायालयात सातत्याने लावून धरला आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. पूर्णिमा उपाध्याय व अ‍ॅड. बी.एस. साने मात्र आजही तेवढ्याच जिद्दीने न्यायालयासमोर हा मुद्दा मांडत आहेत आणि हाच एकमात्र आशेचा किरण आहे. राजकीय पक्षांद्वारा मात्र या कुपोषणाचे भांडवल करीत राजकीय पोळी शेकण्यावरच भर दिला जात आहे. केवळ १५ दिवसांसाठी येतात बालरोगतज्ज्ञमेळघाटात दर्जेदार आरोग्यसेवाही नाही. हे देखील बालमृत्यू होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कित्येक वर्षानंतर एक बालरोगतज्ज्ञ आलेत आणि गेलेत. आता पुन्हा एक बालरोगतज्ज्ञ १५ दिवसांसाठी येत आहेत. एवढी गंभीर स्थिती असताना शासकीय यंत्रणाच गंभीर नसल्याने समस्या वाढत आहे. मेळघाटात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळू नये, ही प्रगत म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार