शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:07 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही.

अमरावती, दि. 4 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही. मुळात बालमृत्यू रोखण्यासाठी वरवरची मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.आदिवासीबहूल मेळघाट क्षेत्रात सनन १९९६ ते २०१७ या कालावधीत ११ हजार ४३६ बालमृत्यू ( उपजतमृत्यू व बालमृत्यू) झालेत. म्हणजेच वर्षाकाठी सरासरी ५१९ बालमृत्यू होत आहेत. यासोबतच मातामृत्यू देखील होत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. मेळघाटातील कोवळ्या पानगळीचे कारण समजून घेण्यासाठी सन १९९३ पासून मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती, आरोग्यमंत्री, सरसंघचालक, सोनिया गांधी यांच्यासह अनेक समिती प्रमुखांचे दौरे झालेत.मागील २३ वर्षांपासून मुंबई व नागपूरच्या उच्च न्यायालयात जनहित याचिकांवर सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास अद्यापही संपलेला नाही. यावर काम करणारे अभियोक्ता अद्यापही मेळघाटात येऊन बालमृत्युची कारणे समजून घेऊ शकलेले नाहीत. कालचे विरोधक आणि आजच्या शासनकर्त्यांनी त्याकाळात मेळघाटातील बालमृत्यूचा प्रश्न सातत्याने पेटता ठेवला. आज मात्र त्यांना या भीषण वास्तवाचा विसर पडला. मेळघाटातील ‘खोज’ संस्थेने हा प्रश्न न्यायालयात सातत्याने लावून धरला आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. पूर्णिमा उपाध्याय व अ‍ॅड. बी.एस. साने मात्र आजही तेवढ्याच जिद्दीने न्यायालयासमोर हा मुद्दा मांडत आहेत आणि हाच एकमात्र आशेचा किरण आहे. राजकीय पक्षांद्वारा मात्र या कुपोषणाचे भांडवल करीत राजकीय पोळी शेकण्यावरच भर दिला जात आहे. केवळ १५ दिवसांसाठी येतात बालरोगतज्ज्ञमेळघाटात दर्जेदार आरोग्यसेवाही नाही. हे देखील बालमृत्यू होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कित्येक वर्षानंतर एक बालरोगतज्ज्ञ आलेत आणि गेलेत. आता पुन्हा एक बालरोगतज्ज्ञ १५ दिवसांसाठी येत आहेत. एवढी गंभीर स्थिती असताना शासकीय यंत्रणाच गंभीर नसल्याने समस्या वाढत आहे. मेळघाटात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळू नये, ही प्रगत म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार