शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एसटीच्या चार विभागांचा ११ कोटींचा महसुल पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:55 IST

महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरला सर्वाधिक फटका : एकूण ५० हजार फेऱ्या रद्दऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान

पुणे : अतिवृष्टी व महापुरामुळे एसटी महामंडळाचे अनेक फेऱ्या रद्द केल्याने दहा दिवसांत सुमारे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामध्ये पुण्यासह कोल्हापुर, सांगली व सातारा विभागातील तब्बल ५० हजार फेºया झाल्याने ११ कोटींहून अधिक उत्पनावर पाणी सोडावे लागले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापुर विभागाला बसला असून ३० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला  दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचेही नुकसान  झाले आहे. एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज एसटी महामंडळाने वर्तविला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. पाऊस व महापुराचा सर्वाधिक फटका एसटीच्या कोल्हापुर विभागाला बसला आहे. कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. या विभागातील दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यान सुमारे २९ हजार ५१७ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा महसुल बुडाला आहे. त्याखालोखाल सांगली विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या विभागातील सुमारे ८ हजार फेऱ्या रद्द केल्याने सव्वा चार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यानंतर सातारा विभागातील सुमारे ६ हजार तर पुणे विभागातील सुमारे ४ हजार फेºया रद्द केल्या आहेत. या आगारांतून सांगली व कोल्हापुरसह कर्नाटकडे जाणारी सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ५ आॅगस्टपासून एकही बस या दिशेने रवाना झालेली नाही. सोलापुर विभागातूनही सुमारे दीड हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एकुण ११ कोटी १३ लाख रुपयांचा महसुल बुडाला असून बसस्थानकांचेही नुकसान झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली............

पाच विभागांची दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यानची स्थितीविभाग                  रद्द फेऱ्या                 बुडालेला महसुलपुणे                    ३९६५                    १,११,३६,९७६सांगली                ८०६०                    ४,२५,९१,५५५कोल्हापुर              २९५१७                 ३,३०,११,२६८सातारा                  ६१८०                   २,१५,१७,६४६सोलापूर                १४७४                   ३०,५६,६९३  

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेfloodपूरRainपाऊस