शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी १०० कोटी

By admin | Updated: February 10, 2016 02:32 IST

श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत

मुंबई : श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत (एमएडीसी) करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी १०० कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.राज्य शासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यामार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या सुमारे २२० कोटींच्या निधीमधून सुमारे २०० कोटी रु पयांचा खर्च कंपनीने केला आहे. उर्वरित २० कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या कामांवर खर्च होणार आहेत, तसेच इतर कामांसाठी १०० कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करून विमानतळासाठी ३६४ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता आज देण्यात आली.विमानतळाची उभारणी व विकासातील पहिल्या टप्प्यातील काही कामे पूर्ण झाली असून, इतर कामे मंजूर निधीतून करण्यात येतील. विमान वाहतुकीची भविष्यातील क्षमता, व्याप आणि क्षेत्र विचारात घेऊन, दुसऱ्या टप्प्यांतर्गत विमानतळाच्या धावपट्टीचे आकारमान २२०० मी. बाय ४५ मी. वरून ३२०० मी. इतके वाढविणे, टर्मिनल इमारतीची क्षमता वाढविणे, वाहनतळाची क्षमता वाढविणे, समांतर टॅक्सी-मार्गासाठी सुविधा उपलब्ध करणे, टर्मिनल इमारतीमध्ये बॅगेज स्क्रीनिंग मशीन, पॅसेंजर सिक्युरिटी चेक अरेंजमेंट, विंड डायरेक्शन इंडिकेटर इत्यादी सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.विमानतळाची उभारणी आणि विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे परीरक्षण व परिचालन करण्यासाठी विमानतळ कंपनीस स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे विमानतळ चालविण्यासाठी देण्यासही मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करणारश्रीसाई शताब्दी वर्ष २०१७-१८ मध्ये साजरे होणार असून, त्यापूर्वी विमानतळाचे काम पूर्ण व्हावे, म्हणून ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी एवढे अनुदान मंजूर करून दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. विमानतळासाठी ३५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, इतर कामे घेण्यासाठी सुमारे २२ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य शिर्डी विमानतळास हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.