शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिक्षक, शिक्षकेतरांना १००% उपस्थिती बंधनकारक; अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 06:13 IST

परीक्षांच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन अशा अनेक कामांचा समावेश होत असतो.

मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करून निकाल लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर आता परीक्षेच्या कामकाजासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढे १००% उपस्थिती लावणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.परीक्षांच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन अशा अनेक कामांचा समावेश होत असतो. अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले.निर्णयाविरोधात संघटनांकडून नाराजीबॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रजिस्टार यांच्यासह आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. तर, एम. के. संघवी, आरकेटी -उल्हासनगर, आदर्श महाविद्यालय बदलापूर, केबीपी महाविद्यालय वाशी आदी ठिकाणी शिक्षकांना संसर्ग झाल्याची माहिती सचिव मधू परांजपे यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण