18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

By Admin | Updated: May 17, 2016 20:44 IST2016-05-17T20:44:01+5:302016-05-17T20:44:01+5:30

15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10-day water supply to Yeola city from May 18 | 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

ऑनलाइन लोकमत
येवला, दि. १७ : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18  मे पासून येवला शहराला 10  दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 17 द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक आहे. 
हे पाणी आगामी  1 जुलै पर्यंत पुरवण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.पाणी जून अखेर पुरवण्याचे आव्हान पेलवले जाणार नसल्याची चिन्हे आहेत.पाऊस जर आला नाही तर जुनच्या पहिल्या आठवड्यात  पाण्यासाठी शहरवासीयांची वनवन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यंदाच्या पालखेड आवर्तनां प्रमाणे पुढील आवर्तन येण्यास देखील विलंब झाला होता.सध्या  येवला शहरातील साठवण तलावात उपलब्ध 17  द ल घ फुट पाण्याच्या  साठ्यातून येवला शहराला 10  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ,मुख्याधिकारी  राहुल वाघ,पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख,अभियंता जे.बी.फुलारी  यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरस्त करून घ्यावे.
शहराला पिण्यासाठी रोज 50 लाख लिटर पाणी लागते. सध्याचे 17 द.ल. घ.फुट पाणी 10 दिवसाच्या अंतराने शहरवासियांना दिले तर 15 जून पर्यंत पाणी पुरणार आहे. 
येवला तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील साठवण तलावात आलेल्या 17 दलघफू पाणी शिल्लक आहे.पाण्याचे काटेकोर नियोजन केले नाही तर अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर उपसा यामुळे जून च्या पहिल्या आठवड्यात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा आहे. साठवण तलावालगत असलेल्या काही विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जाण्यापूर्वीच आता पालिकेने पाण्याबाबत काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
पालिकेने अनधिकृत पाणी उपश्या बाबत पथके तयार केली असली तरी अवैध मार्गाने पाणी उपसा चालू असल्याची चर्चा शहरात आहे.रात्रीच्या वेळी साठवण तलाव परिसरात पाण्याची विक्री होणार नाही याची देखील पालिकेला काळजी घ्यावी लागेल.अनधिकृत सर्रास पाणी उपसा आजही होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे 125 ते 150 टँकर पाणी शहरातील साठवण तलाव लगतच्या पाणी स्रोतातून भरले जात आहे.

Web Title: 10-day water supply to Yeola city from May 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.