शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

शिर्डीसह १0 विमानतळ मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 05:24 IST

विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला.

मुंबई : शिर्डीसह राज्यातील दहा विमानतळांचा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला. या मध्ये शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विमानतळांचा समावेश आहे. शिर्डी विमानतळावरून येत्या नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तर राजगुरुनगर येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या करारावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर.एन.चौबे, मुख्य सचिव स्वाधीन क्षित्रय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन डॉ. गुरूप्रसाद महापात्रा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, एमएमआरडीए आयुक्त युपीएस मदान आदी उपस्थित होते. या विमानतळांसाठी राज्य शासन देणार असलेल्या सवलतींची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. शिर्डी विमानतळ येथून नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण राज्य सरकारला सर्व सहकार्य करेल, असे अशोक गजपती राजू यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळराजगुरुनगर (नवीन चाकण) येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येणार आहे. राजगुरु नगरच्या (खेड) पूर्व भागात भारत फोर्ज कंपनीच्या ‘सेझ‘जवळील जागेत विमानतळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची (एमएडीए) या जागेला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विमानतळ होईल. सुमारे दोन हजार एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित आहे लोहगाव येथील लष्कराचा तळ या विमानतळाच्या पट्ट्यात येत असल्याने लष्कराच्या हरकतीमुळे चाकण विमानतळाचा प्रस्ताव २००७ मध्ये बारगळला. त्यानंतर तो शिरोली-चांदूस येथील जागेची निवड करण्यात आली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे या विमानतळासाठी कोये-कुरकुंडी येथील जागा सूचविण्यात आली. मात्र, ती जागाही नाकारून आता राजगुरूनगरच्या जागेची पाहाणी होणार आहे. जागा निवडीतच या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेली चौदा वर्षे फरफट सुरू आहे.>सरकार या सवलती देणारइंधनावरील मूल्यवर्धित त कराचा दर १० वर्षांसाठी एक टक्का इतका करण्यात येईल.विमानतळांच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक तेवढी जमीन विनामूल्य देणार.विमानतळांना रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतुकीचे मार्ग आदींनी जोडण्यात येईल.या विमानतळांना पोलीस आणि अग्रिशमन सेवा नि:शुल्क पुरविली जाईल.राज्य शासनाकडून या विमानतळांना वीज, पाणी आदी सुविधांसाठी भरीव सवलत देणार