शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

शिर्डीसह १0 विमानतळ मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 05:24 IST

विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला.

मुंबई : शिर्डीसह राज्यातील दहा विमानतळांचा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला. या मध्ये शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विमानतळांचा समावेश आहे. शिर्डी विमानतळावरून येत्या नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तर राजगुरुनगर येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या करारावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर.एन.चौबे, मुख्य सचिव स्वाधीन क्षित्रय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन डॉ. गुरूप्रसाद महापात्रा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, एमएमआरडीए आयुक्त युपीएस मदान आदी उपस्थित होते. या विमानतळांसाठी राज्य शासन देणार असलेल्या सवलतींची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. शिर्डी विमानतळ येथून नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण राज्य सरकारला सर्व सहकार्य करेल, असे अशोक गजपती राजू यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळराजगुरुनगर (नवीन चाकण) येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येणार आहे. राजगुरु नगरच्या (खेड) पूर्व भागात भारत फोर्ज कंपनीच्या ‘सेझ‘जवळील जागेत विमानतळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची (एमएडीए) या जागेला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विमानतळ होईल. सुमारे दोन हजार एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित आहे लोहगाव येथील लष्कराचा तळ या विमानतळाच्या पट्ट्यात येत असल्याने लष्कराच्या हरकतीमुळे चाकण विमानतळाचा प्रस्ताव २००७ मध्ये बारगळला. त्यानंतर तो शिरोली-चांदूस येथील जागेची निवड करण्यात आली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे या विमानतळासाठी कोये-कुरकुंडी येथील जागा सूचविण्यात आली. मात्र, ती जागाही नाकारून आता राजगुरूनगरच्या जागेची पाहाणी होणार आहे. जागा निवडीतच या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेली चौदा वर्षे फरफट सुरू आहे.>सरकार या सवलती देणारइंधनावरील मूल्यवर्धित त कराचा दर १० वर्षांसाठी एक टक्का इतका करण्यात येईल.विमानतळांच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक तेवढी जमीन विनामूल्य देणार.विमानतळांना रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतुकीचे मार्ग आदींनी जोडण्यात येईल.या विमानतळांना पोलीस आणि अग्रिशमन सेवा नि:शुल्क पुरविली जाईल.राज्य शासनाकडून या विमानतळांना वीज, पाणी आदी सुविधांसाठी भरीव सवलत देणार