शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:42 IST

नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आला. या द्रुतगती मार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले...

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत तब्बल १० लाख ४२ हजार वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या असून, कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गाचा वापर केल्याने प्रवासी संख्येत ही वाढ झाली. त्यातून एका महिन्यात टोलद्वारे सुमारे ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत जमा झाले.

नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आला. या द्रुतगती मार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले. तेव्हापासून १५ मार्च २०२५पर्यंत या महामार्गावरून १,८५,२६,३३७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यातून एमएसआरडीसीला आतापर्यंत १३०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सद्य:स्थितीत या महामार्गावरून दरमहा सरासरी ३० हजार वाहने धावतात. फेब्रुवारीत आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा १०,४२,१७१ वाहनांनी प्रवास केला. येत्या महिनाभरात समृद्धीचा शेवटचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत येईल.

कोणत्या महिन्यात किती वाहने धावली?सप्टेंबर २०२४    ७,६३,७६२ऑक्टोबर २०२४    ७,८५,२५६नोव्हेंबर २०२४    ९,१४,४४१डिसेंबर २०२४    १०,००,६५९जानेवारी २०२५    ९,६७,७२२फेब्रुवारी २०२५    १०,४२,१७११,८५,२६,३३७ एकूण

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गKumbh Melaकुंभ मेळा