शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:24 IST

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि घरोघरी नळातून पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली. त्यासाठी, मध्य प्रदेश सरकारतर्फे कटनी क्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. कटनी जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना यापूर्वीच्या सरकारमधील आणि विद्यमान सरकारमधील फरक सांगितला. राज्यातील जलसिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत असून सिंचन योजनांच्या माध्यमातून शेती पाण्याखाली आणली जात असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटलं. 

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कटनी परीक्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली असून ८० हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच, कटनी तालुक्यातील बहोरीबंद येथील ८६, रीठी येथील १७ आणि स्लीमनाबादच्या ४३ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तर, जलजीवन मिशनद्वारे कटनी जिल्ह्यातील रीठी जनपदच्या १०९ आणि कटनी जनपदच्या ५० गावांसह जिल्ह्याच्या पठारी प्रदेशातील १५९ गावांमध्ये आता नळाद्वारे सहजपणे पाणी पोहोचणार आहे.

कटनी जिल्ह्यातील बडगांव येथील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील जलसिंचन व मिशन जलजीवन योजनांबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी कटनी जिल्ह्यातील ३१३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. राज्यातील विकासकामांची माहिती देताना महिला भगिंनीसाठी नुकतेच सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा उल्लेख करत राज्यात सरकार नसून कुटुंब आहे. एक कुटुंब म्हणून आपण राज्याचा कारभार चालवत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा या कुटुंबाचा सदस्य आहे, असेही यावेळी चौहान यांनी म्हटले.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान