शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:24 IST

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि घरोघरी नळातून पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली. त्यासाठी, मध्य प्रदेश सरकारतर्फे कटनी क्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. कटनी जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना यापूर्वीच्या सरकारमधील आणि विद्यमान सरकारमधील फरक सांगितला. राज्यातील जलसिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत असून सिंचन योजनांच्या माध्यमातून शेती पाण्याखाली आणली जात असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटलं. 

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कटनी परीक्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली असून ८० हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच, कटनी तालुक्यातील बहोरीबंद येथील ८६, रीठी येथील १७ आणि स्लीमनाबादच्या ४३ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तर, जलजीवन मिशनद्वारे कटनी जिल्ह्यातील रीठी जनपदच्या १०९ आणि कटनी जनपदच्या ५० गावांसह जिल्ह्याच्या पठारी प्रदेशातील १५९ गावांमध्ये आता नळाद्वारे सहजपणे पाणी पोहोचणार आहे.

कटनी जिल्ह्यातील बडगांव येथील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील जलसिंचन व मिशन जलजीवन योजनांबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी कटनी जिल्ह्यातील ३१३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. राज्यातील विकासकामांची माहिती देताना महिला भगिंनीसाठी नुकतेच सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा उल्लेख करत राज्यात सरकार नसून कुटुंब आहे. एक कुटुंब म्हणून आपण राज्याचा कारभार चालवत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा या कुटुंबाचा सदस्य आहे, असेही यावेळी चौहान यांनी म्हटले.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान