शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:24 IST

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि घरोघरी नळातून पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली. त्यासाठी, मध्य प्रदेश सरकारतर्फे कटनी क्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. कटनी जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना यापूर्वीच्या सरकारमधील आणि विद्यमान सरकारमधील फरक सांगितला. राज्यातील जलसिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत असून सिंचन योजनांच्या माध्यमातून शेती पाण्याखाली आणली जात असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटलं. 

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कटनी परीक्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली असून ८० हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच, कटनी तालुक्यातील बहोरीबंद येथील ८६, रीठी येथील १७ आणि स्लीमनाबादच्या ४३ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तर, जलजीवन मिशनद्वारे कटनी जिल्ह्यातील रीठी जनपदच्या १०९ आणि कटनी जनपदच्या ५० गावांसह जिल्ह्याच्या पठारी प्रदेशातील १५९ गावांमध्ये आता नळाद्वारे सहजपणे पाणी पोहोचणार आहे.

कटनी जिल्ह्यातील बडगांव येथील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील जलसिंचन व मिशन जलजीवन योजनांबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी कटनी जिल्ह्यातील ३१३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. राज्यातील विकासकामांची माहिती देताना महिला भगिंनीसाठी नुकतेच सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा उल्लेख करत राज्यात सरकार नसून कुटुंब आहे. एक कुटुंब म्हणून आपण राज्याचा कारभार चालवत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा या कुटुंबाचा सदस्य आहे, असेही यावेळी चौहान यांनी म्हटले.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान