शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! ऑनलाईन लोनमध्ये गुरफटत गेला, पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:23 IST

आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून दोन लहान मुलांसह पती-पत्नीने स्वत:चे जीवन संपवले. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पती-पत्नी अगोदर आपल्या मुलांना विष पाजले, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडित व्यक्तीने आर्थिस संकटात सापडल्याने, कर्जामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे. 

भोपाळच्या रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती, पोलिसांना घटनास्थळी सेल्फॉसच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत. पती-पत्नीने अगोदर ८ वर्षाच्या मुलाला आणि नंतर ३ वर्षाच्या मुलाला सल्फासच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर, पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे एसीपी चंद्रप्रकाश पांडे यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एका खासगी इन्शुरन्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, आर्थिक नुकसान झाल्यामुले ते दूर करण्यासाठी त्याने कर्ज काढले होते. मात्र, कर्ज काढल्यानंतर तो अधिकच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. कर्जाचे हफ्ते थकत गेले आणि कर्ज वाढत गेल्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. ऑनलाईन लोन व जॉबच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारात गुरफटून गेल्याने पीडित व्यक्तीला संबंधित लोन कंपनीकडून मानसिक त्रास झाला. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. 

दरम्यान, सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, आमचे शवविच्छेन न करता, चौघांवरही एकत्रितपणे अंत्यविधी करण्यात यावा, अशी इच्छा पीडित व्यक्तीने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचे आढळून आले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश