शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 19:18 IST

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात भीषण अपघात.

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारा टॅम्पो आणि ऑटो यांची धडक झाल्याने हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली त्यामुळे ऑटोमध्ये बसलेले मजूर वाहनाखाली गाडले गेले.

दरम्यान, सर्व मृत व जखमी प्रतापपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते ऑटोने प्रवास करत होते. रेल्वेने पुढील प्रवास करण्यासाठी ते ऑटोने सिहोरा स्थानकाकडे जात होते. पण खमरिया गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एका मुलासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी नाकाबंदी करून राज्य महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने तातडीने या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू