शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 19:18 IST

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात भीषण अपघात.

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारा टॅम्पो आणि ऑटो यांची धडक झाल्याने हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली त्यामुळे ऑटोमध्ये बसलेले मजूर वाहनाखाली गाडले गेले.

दरम्यान, सर्व मृत व जखमी प्रतापपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते ऑटोने प्रवास करत होते. रेल्वेने पुढील प्रवास करण्यासाठी ते ऑटोने सिहोरा स्थानकाकडे जात होते. पण खमरिया गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एका मुलासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी नाकाबंदी करून राज्य महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने तातडीने या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू