शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 15:29 IST

Madhya Pradesh News: काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार.

Madhya Pradesh News: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना देशातील बेरोजगारीवरुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. 'ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, तिथे तरुणांना बेरोजगारीची गंभीर समस्या भेडसावते. भारत जोडो यात्रेदरम्यान मी ज्या भाजपशासित राज्यातून गेलो, तेथील तरुणांनी माझ्याकडे रोजगाराची सर्वाधिक चिंता व्यक्त केली,' अशी टीका राहुल यांनी केली.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान मी तरुणांना विचारायचो, तुम्ही काय शिकलात आणि सध्या काय करता? कोणी म्हणायचं मी, इंजिनीअरिंग, कोणी मेडिकल, कोणी कायदेशीर शिक्षण घेतले आहे, पण ते सगळे बेरोजगार आहेत. या तरुणांना देशाच्या विकासात आणि उभारणीत हातभार लावायचा आहे, पण त्यांना रोजगार मिळत नाही.

मध्य प्रदेशात उत्साही, सक्षम तरुण आहेत, पण त्यांच्याकडे रोजगार नाही. यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. छत्तीसगड, हिमाचल आणि कर्नाटकमध्ये आमच्या पक्षाने यापूर्वी जी काही आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली आहेत. काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार. मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत, छोटे व्यावसायिक रोजगार देतात, पण पंतप्रधान मोदींनी देशातील छोट्या व्यावसायिकांची वाढ थांबवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणतात की, देशात फक्त गरीब वर्गातील लोक जीएसटी भरतात आणि हे गरीब वर्ग ओबीसी, दलित आणि सामान्य वर्गातील दुर्बल लोक आहेत. केंद्रातील भाजप सरकार या गरीब लोकांकडून जीएसटी वसूल करते आणि ते पैसे बँकांच्या माध्यमातून देशातील तीन-चार उद्योगपतींना देते. आजच्या सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून छोट्या आणि मध्यम उद्योगांवर हल्ला केला. जीएसटी कर नाही, तर शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे हत्यार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकPoliticsराजकारण