शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 20:48 IST

'दीनदयाल रसोई' अंतर्गत मध्य प्रदेशातील गरीब नागरिकांना पाच रुपयांत जेवण दिले जाते.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी 'दीनदयाल रसोई'(Deendayal Rasoi) बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या दीनदयाल रासोईच्या नावात कोणताही बदल होणार नाही, अशी स्पक्टोक्ती त्यांनी दिली. कॅबिनेटमध्ये दीनदयाल रसोईला 'मामा की थाली' नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

सीएम शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, 'ही योजना दीनदयाल रसोई याच नावाने सुरू राहील, नावात कोणताही बदल केला जाणार नाही. नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तो प्रस्ताव मान्य केला नाही.' 

बैठकीत सर्व मंत्र्यांचे नाव बदलण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देत ​​या योजनेचा विस्तार पालिका स्तरापर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, ही थाली दहाऐवजी पाच रुपयांत मिळणार असून, दीनदयाल रसोईसोबतच मामा की थाली हे नावही जोडले जाईल, असे ते म्हणाले होते. पण, काही वेळातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, या योजनेचे नाव दीनदयाल रसोई राहील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. 

काय आहे दीनदयाल रसोई? राज्यातील शहरी भागात व्यवसाय आणि मजुरीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीबांना 'दीनदयाळ अंत्योदय भोजन योजना' सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अतिशय स्वस्तात जेवन दिले जाते. ही योजना सर्व जिल्हा मुख्यालयांसह मैहर, अमरकंटक, महेश्वर, ओंकारेश्वर, चित्रकूट अशा 6 धार्मिक शहरांमध्ये कार्यरत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा