शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 08:57 IST

हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : मध्यप्रदेशात १ ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीची सभा घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर, काँग्रेस पक्ष नेतृत्वानेही या मुद्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी १ ऑक्टोबर रोजी भोपाळमध्ये सभा घेण्याचे निश्चित करण्यापूर्वी सल्लाही घेतला नाही, त्यामुळे कमलनाथ हे नाराज आहेत. कमलनाथ यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राज्यातील काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत आभासी युद्ध करत आहे. दरम्यान, यानंतर ही रॅली रद्द करण्यात आली. 

काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सांगितले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संयुक्त रॅलीसाठी तयारी करणे कठीण होईल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पाही याच कारणामुळे अडचणीत आला आहे. कमलनाथ यांनी स्पष्ट केले की, भाजपचा सामना करण्यासाठी राज्यातील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह भाजपचे नेते राज्यात अक्षरश: तळ ठोकून आहेत. दुसरे म्हणजे, समाजवादी पक्ष, आप आणि इतर पक्षांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची त्यांची योजना आधीच जाहीर केली आहे.

हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत. तर, द्रमुकची उपस्थिती काँग्रेससाठी पेच निर्माण करणारी ठरणार आहे. 

कमलनाथ हे आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांपेक्षा कट्टर हिंदू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी भाजपशी स्पर्धा करत आहेत. साधू-संत भाजपचा प्रचार करत असताना त्यांनी भोपाळमध्ये बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक झाली होती. यावेळी काँग्रेस नेतृत्वाने भोपाळ येथे विरोधी पक्षांची संयुक्त सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस