शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण करार, दोन्ही राज्यातील लाखो हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 23:19 IST

Madhya Prdesh News: मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापी खोरे मेगा रिचार्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण  करारावर सह्या झाल्या आहेत. या योजनेमुळे मध्य प्रदेशमधील एक लाख आणि महाराष्ट्रामधील दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापी खोरे मेगा रिचार्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण  करारावर सह्या झाल्या आहेत. या योजनेमुळे मध्य प्रदेशमधील एक लाख आणि महाराष्ट्रामधील दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या या संयुक्त योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र आंतरराज्यीय नियंत्रण मंडळाच्या २८ व्या बैठकीनंतर दोन्ही सरकारमध्ये हा करार झाला आहे. ही बैठक मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील कुशाभाऊ  कन्व्हेंशनल सेंटरमध्ये झाली. या बैठकीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाची औपचारिकता पार पडल्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी करारावर सह्या करून फाईलचे आदान प्रदान केले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील संबंधांच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. दोन राज्यांमध्ये होत असलेल्या नदीच्या कराराकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. गोदावरी आणि तापी नदीबाबत आमचे आणि महाराष्ट्राचे खास संबंध आहेत. तापी नदीचं महत्त्व हे नर्मदा नदीप्रमाणे आहे. मध्य प्रदेश हे नद्यांचं माहेरघर आहे. येथून सुमारे २४७ नद्या वाहतात. आमच्या राज्यात कुठलाही हिमनग नाही आहे. मात्र आमच्याकडे जलसाठा एवढा आहे की, गंगा यमुनेपेक्षा अधिक पाणी आमचं राज्य इतर भागांना देतं. आमच्या राज्यातील नद्या ह्या देशातील प्रत्येक राज्यातील नदीशी जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच त्यांना पाणीपुरवठा करत आहेत.  

मोहन यादव पुढे म्हणाले की, तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्प नैसर्गिक आहे. संपूर्ण जगात यापेक्षा चांगला प्रकल्प कुठेच नाही आहे. पाण्याच्या टंचाईमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागल होता. आता हा प्रकल्प पूर्ण निमाड भागासाठी जीवन रेषेचं काम करेल, याचा मला आनंद आहे. या प्रकल्पामुळे भूजलसाठ्यामध्ये वाढ होईल. तसेच सिंचनाची चांगली सोय होईल. आम्ही महाराष्ट्रासोबत मिळून आपला जुना वारसा जीवित करू. महाराष्ट्रातील बंदरांमधून व्यापार वाढवू. जबलपूरपासून नागपूरपर्यंत एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर बनवण्यात येईल. त्यामुळे खर्चात बचत होईल. तसेच मध्य प्रदेशमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर यांना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर यांच्याशी जोडून धार्मिक पर्यटनाचं सर्किट बनवण्यात येईल, असेही मोहन यादव यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण अनेक वर्षांपासून तापी रिचार्ज प्रकल्प संकल्पित होता. मात्र तो काही कारणांमुळे लांबणीवर पडलेला होता. आज दोन्ही राज्यांची त्यावर सहमती झाली आहे. तसेच आमच्या त्यावर सह्याही झाल्या आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रकल्पाच्या कामासाठी जी गतिशिलता दाखवली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.

तापी बेसिन मेगा रिचार्ज योजना ही जगातील सर्वात मोठी ग्राऊंड रिचार्ज योजना आहे. या मेगा रिचार्ज योजनेमध्ये ३१.१३ टीएमसी पाण्याचा उपयोग होईल. यातल ११.७६ टीएमसी पाणी मध्य प्रदेशला तर १९.३६ टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळेल. या योजनेमधून मध्य प्रदेशमधील १ लाख २३ हजार ८२ हेक्टर आणि महाराष्ट्रातील २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी