शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:11 IST

Madhya Pradesh Assembly Election: सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले. 

मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. भाजपाकडून राज्यातील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेसने भाजपाचा पाडाव करून मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, येथील प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींपर्यंत पोहचल्या आहेत. सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले. 

एका प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींची भाषणं ऐकली आहेत. ते प्रत्येक ठिकाणी सांगतात की, मी ओबीसी समाजातील आहे. ते वारंवार हे सांगून पंतप्रधान बनले. एका दिवसामध्ये ते किमान एक सूट परिधान करतात. त्यांच्या सूटची किंमत ही लाखो रुपये असते. तुम्ही मोदींना त्यांचे कपडे पुन्हा परिधान केलेले पाहिलं आहे का? मी हे एकच पांढर शर्ट घातलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? की मी जातीआधारिर जणगणनेबाबत बोलण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांच्या भाषणातून जात गायब झाली आहे. आता मोदी भारतात कुठलीही जात नाही म्हणून सांगत आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. 

राहुल गांधींनी पुढे सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर पहिलं पाऊल हे जातीआधारित जनगणना करण्यासाठी उचललं जाईल. आमचा पक्ष जसा सत्तेत येईल, तशी आम्ही देशभरात जातीआधारित जनगणना करू. अशी जनगणना झाली नाही तर मागास वर्ग योगदान देऊ शकणार नाही. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये प्रचारावेळी माझी भेट काही शेतकऱ्यांशी झाली होती. मी त्यांना जमिनीचा भाव विचारला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना जमिनीचा भाव माहितच नव्हता.

सरकार गरिबांकडून जीएसटी घेऊन सगळा पैसा उद्योगपतींना देत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. छोटे व्यापारी जे लहान आणि मध्यम व्यवसाय चालवतात, जे दुकानं चालवतात. ते लोक रोजगार निर्माण करतात. लाखो छोटे विभाग होते जे रोजगार द्यायचे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेल आले आणि त्यांनी या विभागांवर हल्ला केला. त्यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून व्यापारी आणि मध्यम व्यवसायांवर हल्ला केला. या गोष्टी छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी एक हत्यार सिद्ध झाले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा