शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:11 IST

Madhya Pradesh Assembly Election: सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले. 

मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. भाजपाकडून राज्यातील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेसने भाजपाचा पाडाव करून मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, येथील प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींपर्यंत पोहचल्या आहेत. सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले. 

एका प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींची भाषणं ऐकली आहेत. ते प्रत्येक ठिकाणी सांगतात की, मी ओबीसी समाजातील आहे. ते वारंवार हे सांगून पंतप्रधान बनले. एका दिवसामध्ये ते किमान एक सूट परिधान करतात. त्यांच्या सूटची किंमत ही लाखो रुपये असते. तुम्ही मोदींना त्यांचे कपडे पुन्हा परिधान केलेले पाहिलं आहे का? मी हे एकच पांढर शर्ट घातलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? की मी जातीआधारिर जणगणनेबाबत बोलण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांच्या भाषणातून जात गायब झाली आहे. आता मोदी भारतात कुठलीही जात नाही म्हणून सांगत आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. 

राहुल गांधींनी पुढे सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर पहिलं पाऊल हे जातीआधारित जनगणना करण्यासाठी उचललं जाईल. आमचा पक्ष जसा सत्तेत येईल, तशी आम्ही देशभरात जातीआधारित जनगणना करू. अशी जनगणना झाली नाही तर मागास वर्ग योगदान देऊ शकणार नाही. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये प्रचारावेळी माझी भेट काही शेतकऱ्यांशी झाली होती. मी त्यांना जमिनीचा भाव विचारला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना जमिनीचा भाव माहितच नव्हता.

सरकार गरिबांकडून जीएसटी घेऊन सगळा पैसा उद्योगपतींना देत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. छोटे व्यापारी जे लहान आणि मध्यम व्यवसाय चालवतात, जे दुकानं चालवतात. ते लोक रोजगार निर्माण करतात. लाखो छोटे विभाग होते जे रोजगार द्यायचे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेल आले आणि त्यांनी या विभागांवर हल्ला केला. त्यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून व्यापारी आणि मध्यम व्यवसायांवर हल्ला केला. या गोष्टी छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी एक हत्यार सिद्ध झाले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा