शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 21:34 IST

रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

नवी दिल्ली : सत्तेत ७० वर्षे असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. तसेच, काँग्रेसने कलम ३७० (जम्मू-काश्मीरमधील) हे ७० वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले, असे अमित शाह म्हणाले. रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरात गरीबांचा मसिहा म्हणून ओळखले जाते, कारण ते गरीब लोकांसाठी लोककल्याणकारी काम करत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार मध्य प्रदेशला 'डबल इंजिन सरकार' म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, कमलनाथ यांच्या आधीच्या सरकारमध्ये अवघ्या दीड वर्षात १८,००० हून अधिक वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या सरकारच्या कार्यकाळात दलालांच्या मदतीने एकच उद्योग सुरू झाला, तो म्हणजे हस्तांतरण उद्योग. त्यामुळे लोकांना 'श्रीमान बंटाधार' यांची राजवट आठवली, असे अमित शाह म्हणाले. तसेच, 'श्रीमान बंटाधार' आणि 'करप्शन नाथ' यांच्या सरकारच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प केवळ २३,००० कोटी रुपयांचा होता, तर शिवराज सिंह चौहान यांच्या विद्यमान सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३.१४ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते   कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश