शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 21:34 IST

रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

नवी दिल्ली : सत्तेत ७० वर्षे असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. तसेच, काँग्रेसने कलम ३७० (जम्मू-काश्मीरमधील) हे ७० वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले, असे अमित शाह म्हणाले. रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरात गरीबांचा मसिहा म्हणून ओळखले जाते, कारण ते गरीब लोकांसाठी लोककल्याणकारी काम करत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार मध्य प्रदेशला 'डबल इंजिन सरकार' म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, कमलनाथ यांच्या आधीच्या सरकारमध्ये अवघ्या दीड वर्षात १८,००० हून अधिक वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या सरकारच्या कार्यकाळात दलालांच्या मदतीने एकच उद्योग सुरू झाला, तो म्हणजे हस्तांतरण उद्योग. त्यामुळे लोकांना 'श्रीमान बंटाधार' यांची राजवट आठवली, असे अमित शाह म्हणाले. तसेच, 'श्रीमान बंटाधार' आणि 'करप्शन नाथ' यांच्या सरकारच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प केवळ २३,००० कोटी रुपयांचा होता, तर शिवराज सिंह चौहान यांच्या विद्यमान सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३.१४ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते   कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश