शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

आई सुरक्षित तर देश सुरक्षित !

By admin | Published: April 12, 2017 1:54 PM

सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यतं आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत.

‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस’ प्रत्येक आईला आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृत करत आहे. सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यंत आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत. 11एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात अजूनही प्रसुतीदरम्यान, प्रसुतीनंतर माता मृत्यूचं, अर्भक मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या पार्शभूमीवर या दिवसाचं महत्त्व म्हणूनच आहे. या दिवसाचं महत्त्व भारतीय समाजात, जनमानसात, गर्भवती स्त्रियांमध्ये रूजावं म्हणून ‘व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया’ ही संघटना चळवळीसारखं काम करत आहे.

बाळाच्या जन्माच्या वेळेस स्त्रीची सुरक्षा  हा तिचा मुलभूत हक्क आहे हे ठासून सांगण्याचं काम ही संघटना करत आहे. या संघटनेत जवळजवळ 1800 संस्था एकत्र आलेल्या आहेत आणि मातृत्व सुरक्षेचं महत्त्व समाजात रूजण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करता आहेत. या संघटनेच्या आग्रहास्तव सरकारनं 2003 मध्ये 11 एप्रिल कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्त्व दिवस’म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित केला.

मूल जन्माला घालण्याआधी आणि जन्माला घातल्यानंतर बाईचं सुरक्षित आणि सुदृढ आरोग्य हा तिचा अधिकार आहे, हे प्रत्येकीच्या मनात बिंबवणं हाच "व्हाइट रिबन्स अलायन्स आॅफ इंडिया"चा मूळ उद्देश आहे. त्यासाठी मातोच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधांच्या बळकटीकरणाचं काम ही संघटना करते. आरोग्य सेविकांचा क्षमता विकास करणं, मातृ सुरक्षेच्या योजनांमध्ये वाढ करणं, यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशिक्षण आयोजित करणं यासारखे उपक्रम संपूर्ण देशभरात या संघटेनेमार्फत राबवले जातात.

एकीकडे देशात मातामृत्यूचं प्रमाण आजही जास्त आहे तरीही गर्भवती स्त्रियांपर्यंत, मातांपर्यंत किफायतशीर दरात पुरेशा आरोग्य सेवा, माहिती, तंत्रज्ञान पोहोचवलं, त्यांना आपल्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याविषयी जागृत आणि शिक्षित केलं तर हे प्रमाण नक्कीच कमी होवू शकतं. गर्भावस्थेत सकस आहार घेणं, प्रसुती झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करणं या गोष्टी तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं, नवजात बाळाला रोगांपासून दूर ठेवणाऱ्या त्याच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे स्त्रियांना पटवून देण्यासाठी ही संघटना कार्य करते आहे.

मातामृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचं आणि एका कुटुंबाचं नुकसान नसतं. संपूर्ण देश ते नुकसान सोसत असतं. देश ती स्त्री देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात करू शकणाऱ्या योगदानाला मुकतो. समाज तिच्या सल्ला मसलतीला मुकतो. आणि तिचं स्वत:चं कुटुंब तिच्या प्रेमाला, काळजीला, तिच्या पोषणाला आणि उत्पादनक्षमतेला मुकतो आणि म्हणूनच प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात स्त्रीचं आरोग्य सुरक्षित राहाणं खूप महत्त्वाचं आहे हा व्यापक विचार घेऊन व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया काम करत आहे.

या संघटनेच्या मते मातामृत्यू रोखण्याचे महत्त्वाचे मार्ग म्हणजे * प्रत्येक गर्भवती स्त्रीची प्रसुती ही दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होणं. * किशोरवयीन आणि मातावयीन मुलींमधलं अ‍ॅनेमियाचं प्रमाण कमी करणं.* गर्भावस्थेत सकस आहार घेण्याच्या महत्त्वाबद्दल स्त्रियांना माहिती शिक्षण देणं. * कुटुंबनियोजनाचं महत्त्वं आणि त्याचे सुरक्षित उपाय याबद्दल स्त्रियांमध्ये जनजागृती करणं. * गर्भावस्थेत प्रत्येक स्त्रीनं आपली पुरेपूर काळजी घेणं. * बाळाला स्तनपान करण्याचं महत्त्व प्रत्येक स्त्रीला पटणं. * प्रसूतीनंतर मातेच्या वेदना, अतिरक्तस्त्राव, संसर्ग रोखणारे औषधं, वैद्यकीय सेवा प्रत्येक स्त्रीला उपलब्ध असणं* बालविवाह रोखणं* प्रसूतीदरम्यान येवू शकणाऱ्या अडचणींची जाणीव खूप आधीच होणं. * प्रसूतीदरम्यान, प्रसूतीनंतर स्त्रीची योग्य काळजी घेणं* लैंगिक आजार रोखणं आणि नियंत्रित करणं* मातेला आणि तिच्या बाळाला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणं आणि सर्वात