शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख जरूर एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:58 IST

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत

रवंथ हे फक्त गाई गुरेच नाहीत करत तर त्यांच्याहूनही अधिक माणसांना रवंथ करायची सवय लागली आहे.थोडे तुम्हाला आश्चर्यही वाटेल माणसं कसलं रवंथ करतात. मला इथे पान, तंबाखू किंवा गुटखा खाऊन केलेल्या रवंथा बद्दल बोलायचेच नाही.आता या पेक्षा हि वेगळे रवंथ कोणते ते सांगते .

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत आज?अर्थातच, मी याच गोष्टीची वाट पाहत असावे.मी पटकन शाळेत झालेला मनस्ताप इतिवृत्ता सह यांना सांगितला.वाटले आता तरी जरा आराम वाटेल डोक्याला. पण शक्य नव्हते.जरा वेळाने आईचा फोन आला व आईने हि पटकन ओळखले की हिचे कांही तरी बिघडले आहे. त्यावर पुन्हा मी तिलाही घडला प्रसंग इतिवृत्तासह सांगितला. व अशा पुन्हा पुन्हा त्या विषयाची चर्चा व त्यातून पुनरावृत्ती होत गेल्यामुळे माझा त्रास वाढत गेला यांनी स्पष्टपणे सांगितले हि," अगं किती हा विषय चघळत बसणार आहेस" ..ते सहज बोलून गेले व माझ्या डोक्याची ट्युब पेटली की मी त्याच त्याच घडलेल्या गोष्टींचे रवंथ करत होते मला समजून चुकले होते की मनातल्या या संवाद तुकड्यांना मनात केंद्रस्थान मिळालं की मला त्रास व्हायचा ..हीच गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते बऱ्याच वेळा एकटे असताना ,झोपण्यापूर्वी तेच तेच संवाद,एखादं गाणं, गाण्याची ओळ,किंवा मनावर ठासलेलं एखादं दृश्य मनात दीर्घकाळ उगाळत राहतं.व त्याचा आपल्यावर परिणाम होऊ लागतो.

बऱ्याच वेळा एखादा संवाद,प्रतिमा,आपल्या मनात घर करून राहतात व त्या विसरता विसरत नाहीत कारण या गोष्टीचे आपण रवंथ केलेले असते..

आता या रवंथा बाबत थोडा विचार करूयात अशा रवंथ करण्याच्या सवयीमुळे आपले कामाकडे दुर्लक्ष होते का? अशा रवंथामुळे झोप उडते का?मन चिडचिड होते का? मन विचलित होते का? मनाचं संतुलन बिघडतं का? असे जर होत असेल तर हे रवंथ आपल्याला विकृतीकडे नेत आहे असे समजावे.

आता आपण रवंथ करण्याचा दुसरा प्रकार समजून घेवूयात बऱ्याच वेळा कांही प्रसंगामुळे आपल्याला स्फूर्ती येते ,आनंद वाटतो असे अनुभव ,सवयी केंव्हाही श्रेष्ठ असतात पण ,त्याचा संबंध जर आपण दुसऱ्या गोष्टीशी जोडत गेलो तर ती पुन्हा विकृती ठरण्यास वेळ लागत नाही.उदा.कांही रिवाज,प्रथा ज्या पडल्या जातात त्या अशाच प्रकारच्या असाव्यात बऱ्याच वेळा आपणसुद्धा एखादी चांगली घटना घडली तर हाच माझा लकी शर्ट अथवा साडी आहे असे सहज म्हणून जातो व त्या प्रसंगाचा व वस्तूचा संबंध जोडतो .पण हे प्रमाण वाढत गेले तर मूळ हेतू कोणता हे बाजूलाच राहते व नाही त्या गोष्टीचा विचार करू लागतो याच गोष्टीतून लकी कलर ची,लकी हिरा,मोती,खडा घालण्याची पध्द्त रुजली असावी .मला वाटते एखादे व्यसन सुद्धा यातूनच जडत असावे खरे पाहता याचा वास्तविक जीवनाशी कांही संबंध नसतो.बऱ्याच वेळा एखादा रिवाज पाळला नाही तर अपराधी पणाची भावना निर्माण होते,कांही तरी पाप घडले असे वाटू लागते,विशिष्ट गोष्ट केली नाही म्हणून असे घडले असे मत करून घेऊन आपणच आपल्या मनाचा छळ करू लागतो..व पुन्हा आपण त्या जाळ्यात ओढले जातो..यावर एकच उपाय म्हणजे रवंथ करणे थांबवावे.मग ते कोणत्याही प्रकारचे असो. चांगल्या अथवा वाईट गोष्टीची मनावर होणारी वारंवारिता थांबविल्यास आपले बरेच प्रॉब्लेम नाहीसे होऊ लागतील अगदी शंभर टक्के

मग बंद करणार ना रवंथ....

लेखिका: सुषमा सांगळे-वनवे   

साहित्यिक

टॅग्स :Healthआरोग्य