शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख जरूर एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:58 IST

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत

रवंथ हे फक्त गाई गुरेच नाहीत करत तर त्यांच्याहूनही अधिक माणसांना रवंथ करायची सवय लागली आहे.थोडे तुम्हाला आश्चर्यही वाटेल माणसं कसलं रवंथ करतात. मला इथे पान, तंबाखू किंवा गुटखा खाऊन केलेल्या रवंथा बद्दल बोलायचेच नाही.आता या पेक्षा हि वेगळे रवंथ कोणते ते सांगते .

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत आज?अर्थातच, मी याच गोष्टीची वाट पाहत असावे.मी पटकन शाळेत झालेला मनस्ताप इतिवृत्ता सह यांना सांगितला.वाटले आता तरी जरा आराम वाटेल डोक्याला. पण शक्य नव्हते.जरा वेळाने आईचा फोन आला व आईने हि पटकन ओळखले की हिचे कांही तरी बिघडले आहे. त्यावर पुन्हा मी तिलाही घडला प्रसंग इतिवृत्तासह सांगितला. व अशा पुन्हा पुन्हा त्या विषयाची चर्चा व त्यातून पुनरावृत्ती होत गेल्यामुळे माझा त्रास वाढत गेला यांनी स्पष्टपणे सांगितले हि," अगं किती हा विषय चघळत बसणार आहेस" ..ते सहज बोलून गेले व माझ्या डोक्याची ट्युब पेटली की मी त्याच त्याच घडलेल्या गोष्टींचे रवंथ करत होते मला समजून चुकले होते की मनातल्या या संवाद तुकड्यांना मनात केंद्रस्थान मिळालं की मला त्रास व्हायचा ..हीच गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते बऱ्याच वेळा एकटे असताना ,झोपण्यापूर्वी तेच तेच संवाद,एखादं गाणं, गाण्याची ओळ,किंवा मनावर ठासलेलं एखादं दृश्य मनात दीर्घकाळ उगाळत राहतं.व त्याचा आपल्यावर परिणाम होऊ लागतो.

बऱ्याच वेळा एखादा संवाद,प्रतिमा,आपल्या मनात घर करून राहतात व त्या विसरता विसरत नाहीत कारण या गोष्टीचे आपण रवंथ केलेले असते..

आता या रवंथा बाबत थोडा विचार करूयात अशा रवंथ करण्याच्या सवयीमुळे आपले कामाकडे दुर्लक्ष होते का? अशा रवंथामुळे झोप उडते का?मन चिडचिड होते का? मन विचलित होते का? मनाचं संतुलन बिघडतं का? असे जर होत असेल तर हे रवंथ आपल्याला विकृतीकडे नेत आहे असे समजावे.

आता आपण रवंथ करण्याचा दुसरा प्रकार समजून घेवूयात बऱ्याच वेळा कांही प्रसंगामुळे आपल्याला स्फूर्ती येते ,आनंद वाटतो असे अनुभव ,सवयी केंव्हाही श्रेष्ठ असतात पण ,त्याचा संबंध जर आपण दुसऱ्या गोष्टीशी जोडत गेलो तर ती पुन्हा विकृती ठरण्यास वेळ लागत नाही.उदा.कांही रिवाज,प्रथा ज्या पडल्या जातात त्या अशाच प्रकारच्या असाव्यात बऱ्याच वेळा आपणसुद्धा एखादी चांगली घटना घडली तर हाच माझा लकी शर्ट अथवा साडी आहे असे सहज म्हणून जातो व त्या प्रसंगाचा व वस्तूचा संबंध जोडतो .पण हे प्रमाण वाढत गेले तर मूळ हेतू कोणता हे बाजूलाच राहते व नाही त्या गोष्टीचा विचार करू लागतो याच गोष्टीतून लकी कलर ची,लकी हिरा,मोती,खडा घालण्याची पध्द्त रुजली असावी .मला वाटते एखादे व्यसन सुद्धा यातूनच जडत असावे खरे पाहता याचा वास्तविक जीवनाशी कांही संबंध नसतो.बऱ्याच वेळा एखादा रिवाज पाळला नाही तर अपराधी पणाची भावना निर्माण होते,कांही तरी पाप घडले असे वाटू लागते,विशिष्ट गोष्ट केली नाही म्हणून असे घडले असे मत करून घेऊन आपणच आपल्या मनाचा छळ करू लागतो..व पुन्हा आपण त्या जाळ्यात ओढले जातो..यावर एकच उपाय म्हणजे रवंथ करणे थांबवावे.मग ते कोणत्याही प्रकारचे असो. चांगल्या अथवा वाईट गोष्टीची मनावर होणारी वारंवारिता थांबविल्यास आपले बरेच प्रॉब्लेम नाहीसे होऊ लागतील अगदी शंभर टक्के

मग बंद करणार ना रवंथ....

लेखिका: सुषमा सांगळे-वनवे   

साहित्यिक

टॅग्स :Healthआरोग्य