यंदा श्रावण २९ दिवसांचाच, मंदिरात प्रवेश मिळणार का ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:28+5:302021-07-18T04:15:28+5:30
लातूर : श्रावण महिन्यात भक्तांची मांदियाळी जिल्ह्यातील विविध गावात असलेल्या शिव मंदिरांत दिसून येते. श्रावण साेमवारी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच माेठ्या ...

यंदा श्रावण २९ दिवसांचाच, मंदिरात प्रवेश मिळणार का ।
लातूर : श्रावण महिन्यात भक्तांची मांदियाळी जिल्ह्यातील विविध गावात असलेल्या शिव मंदिरांत दिसून येते. श्रावण साेमवारी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच माेठ्या प्रमाणावर रांगा लागतात. गतवर्षी काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरांची दारे बंद झाली. मार्च २०२०पासून भाविक-भक्तांना दर्शनाची आस लागली आहे. मात्र, मंदिरांची दारे उघडणार की नाही, याबाबत अद्यापही काही सांगता येत नाही. उत्तर भारतात हिंदी समाजबांधवांची श्रावणपूजा २५ जुलैपासून प्रारंभ हाेत आहे. तर महाराष्ट्रातील मराठी बांधवांचा श्रावणमास ९ ऑगस्टपासून सुरु हाेणार आहे. भाविक-भक्तांना शिवालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. मात्र, शासनाने अद्याप ठाेस निर्णय जाहीर केलेला नाही. शिवालयात हाेणारी भाविकांची गर्दी यामुळे येथे बेल-फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेत्यांना माेठा आधार मिळताे. मात्र, गत दाेन वर्षांपासून हक्काचा राेजगार हिरावला गेला आहे. मंदिर परिसरात हाेणारी सर्वच उलाढाल ठप्प झाली आहे. यंदा श्रावण महिन्यात भाविक-भक्तांना दर्शन घेता येईल, अशी आशा विक्रेते, व्यावसायिक आणि भाविकांना लागून आहे.
९ ऑगस्टपासून श्रावण
उत्तर भारतातील हिंदी समाजबांधवांचा श्रावण मास हा २५ जुलैपासून सुरु हाेत आहे तर महाराष्ट्रातील मराठी समाजबांधवांचा श्रावण मास ९ ऑगस्टपासून सुरु हाेत आहे. यंदा श्रावण महिन्यात पाच साेमवार आले आहेत. दि. ६ सप्टेंबरला शेवटचा श्रावण साेमवार येत आहे. दाेन वर्षांपासून काेराेना प्रादुर्भावामुळे भाविक-भक्तांना श्रावण महिन्यात मंदिरात प्रवेशावर बंदी आहे. यंदा प्रवेश मिळेल का, ही आस लागून आहे.
मंदिर परिसरातील व्यावसायिक म्हणतात...
आमचा उदरनिर्वाह पूजा साहित्य, नारळ विक्रीतून होताे. हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरांची दारे बंद आहेत. त्यामुळे मंदिरातील भाविकांची वर्दळ ओसरली आहे. यातून आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सध्याला घरप्रपंच भागवणे कठीण झाले आहे. आता श्रावण महिन्यात मंदिरांची दारे उघडतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून कुठलाही निर्णय झाला नसल्याने संभ्रम आहे.
- पांडुरंग फुलारी, दुकानदार
बेल-फूल, पूजा साहित्याची श्रावण मासात माेठ्या प्रमाणावर विक्री हाेते. यातून आमचा उदरनिर्वाह चालताे. मात्र, दाेन वर्षांपासून मंदिरांची दारेच बंद असल्याने या व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. आम्ही परंपरेनुसार मंदिर परिसरात बेल विक्रीचा व्यवसाय करताे. आता श्रावण महिन्यात मंदिरांची दारे उघडली तर हा व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, अशी आशा आहे.
- शरण स्वामी, बेल-फूल विक्रेता