शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जागतिक थायलेसेमिया दिन : अनुवंशिक थायलेसेमियाची लातुरात २४७ बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:04 IST

आजार रोखण्यासाठी विवाहापूर्वी रक्तचाचणी आवश्यक

लातूर : थायलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे़ जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ८ बालकांमध्ये हा आजार आढळून येतो़ सध्या जिल्ह्यात २४७ बालकांना हा आजार आहेत़ त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी विवाहापूर्वी पती- पत्नीने रक्तचाचणी करुन घेणे गरजेचे असून शासकीय रुग्णालयात ती मोफत केली जाते, असे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले़

अनुवंशिक असलेल्या थायलेसेमिया आजारात सर्वसाधारण, गंभीर आणि इंटरमेडिएट असे तीन प्रकार आहेत़ गंभीर आजार असलेल्या बालकांमध्ये ३ ते ६ महिने अथवा वर्षभरापर्यंत लक्षणे आढळून येतात़ तर इंटरमेडिएट अवस्थेतील बालकांमधील लक्षणे २ ते ३ वर्षांनी निदर्शनास येतात़ या आजारामुळे रक्तातील लाल पेशी तयार होत नाहीत़ परिणामी, बालकामध्ये स्थिर १० ग्रॅम रक्त ठेवण्यासाठी रुग्णांना बाहेरील रक्त द्यावे लागते़ विशेष म्हणजे, चार आठवड्यांच्या आत रक्ताची गरज भासते़ त्यामुळे या रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो़ जिल्ह्यात २४७ बालकांना हा आजार असून दरवर्षी जवळपास ८ बालकांमध्ये हा आजार आढळून येतो़ तसेच मृत्यूचे प्रमाण हे वार्षिक तीन असे आहे़

या आजारामुळे बालकांचे वजन घटते, जुलाब, उलट्या होणे, ताप भरणे, जंतू संसर्ग, चेहरा निस्तेज होणे, थकवा येणे अशी लक्षणे आहेत़ हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने विवाहापूर्वी यासंदर्भातील रक्त तपासणी करुन घेणे महत्त्वाचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ़ सुनील होळीकर यांनी सांगितले़ तसेच पहिल्या बाळास हा आजार झाला असल्यास दुसऱ्या बाळाला होऊ नये म्हणून निदान करता येते़ रक्त तपासणीची सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे़

४२१ रुग्णांना मोफत रक्त़जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीसह एकूण सहा रक्तपेढ्यांमधून आतापर्यंत ४२१ रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आले असल्याचे राज्य संक्रमण परिषदेला पाठविण्यात आलेल्या अहवालात रक्तपेढ्यांनी नमूद केले आहे़ विवाहापूर्वी पती- पत्नीची रक्त तपासणी तसेच माता गरोदर असतानाही रक्त तपासणी केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो, असे थायलेसेमिया फाऊंडेशनचे सचिव प्रमोद बानाटे यांनी सांगितले़

बालकांची वाढ खुंटतेथायलेसेमियाग्रस्त बालकांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नाहीत़ बालकांची उंची, शारीरिक, बौध्दिक वाढ खुंटते़ त्यामुळे बाहेरील रक्तपुरवठा करावा लागतो़ परिणामी, लोहाचे प्रमाण वाढून त्याचा किडनी, मेंदू, हृदयावर थर साचून धोका पोहोचण्याची भीती असते़ हे प्रमाण रोखण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गोळ्या, व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करुन दिले जातात, असे बालरोगतज्ज्ञ डॉ़ सुनील होळीकर यांनी सांगितले़

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर