शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

जागतिक मानसिक आरोग्य दिन : आजारी पडणाऱ्या मनालाही जपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:28 IST

जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञ मिलिंद पोतदार यांच्याशी संवाद

लातूर : शरीर ज्याप्रमाणे आजारी पडते, त्याचप्रमाणे मानवी मनही आजारी पडत असते. शारीरिक आरोग्याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती आणि प्रबोधन केले जाते. मात्र मानसिक आरोग्याबाबत अद्यापही जाणीव जागृती केली जात नाही. त्यामुळे आजारी पडणाºया मनालाही आपण जपले पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी दिला. 

जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक पातळीवर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांच्या घरात आहे. मात्र भारतामध्ये हेच प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मानसिक आजाराचे बारा प्रकार असून, वेगवेगळ्या प्रकारचे २७५ आजार आहेत. परिणामी, प्रत्येकाने स्वत:वरील ताण-तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वैयक्तिक मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो. एकिकडे प्रगतीच्या तुलनेत आपण भरारी घेतोय. मात्र मानसिक आरोग्याच्या बाबतीत हा आलेख खालावतोय. ही बाब देशासाठी चिंतेची आहे. आरोग्यावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था लोकसंख्येच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर सर्वांनी पुढे येऊन मानसिक आजाराचा सामना करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे आपण अभासी जीवन जगतोय. वास्तविक जीवनापासून आपण दूर जातोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. मात्र त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक आहे. मोबाईल वापरामुळे नवनवीन आजार पुढे येत आहेत, असेही डॉ. पोतदार म्हणाले.

उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम गरजेचामानसिक आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. वैचारिक वाचन, तत्वज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी योगासन, व्यायाम, सकस आहार आणि खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये या सर्व बाबींचे नियोजन केले, तर मनावरील ताण आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक आजार प्रत्येकाला टाळता येईल. मानसिक आजारापाठीमागच्या शास्त्रीय कारणांबाबत जनजागृती झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालयMental Hai Kyaमेंटल है क्या