शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

नगदी पिके न घेताही हेरचे शेतकरी मिळवतात लाखोचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:10 IST

यशकथा : अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नगदी पीक असलेले ऊस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घेणे त्यांनी दोन वर्षांपासून बंद केले आहे़

- हरी मोकाशे ( लातूर )

शिक्षक म्हणून उदगीर, (जि. लातूर) येथे नोकरी सुरू केली़ परंतु दहा महिन्यांतच नोकरीवर पाणी सोडले़ विदेशातील शेतीचे तंत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेती पाहून हेर (ता़ उदगीर) येथील शेतकरी बाबासाहेब पाटील यांनी शेतीत आधुनिक प्रयोग करण्यास सुरुवात केली़ त्याची फळेही मिळू लागली़ गावातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक प्रयोगाद्वारे चांगले उत्पन्न घेत आहेत़

हेर येथील बाबासाहेब बाळासाहेब पाटील यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे़ प्रारंभी ते शिक्षक म्हणून रुजू झाले़ परंतु संपूर्ण बालपणापासूनच शेतीची आवड होती़ त्यामुळे त्यांनी अवघे दहा महिने नोकरी करून शेतीकडे वळले़ एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या पाटील यांना ४५ एकर शेती आहे़ गावातील  जनावरांना चारण्याचे कुरण म्हणजे पाटील यांचे शेत, अशी ओळख होती़ सुरुवातीस त्यांनी पारंपरिक शेतीस सुरुवात केली़ परंतु त्यातून बहुतांश वेळा खर्चही पदरी पडत नव्हता़ त्यामुळे त्यांनी विदेशातील शेतीतंत्राची माहिती घेण्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक शेतीची पाहणी केली़  २००३ मध्ये ठिबक सिंचनचा अवलंब करून ६ फूट रुंदीच्या काकऱ्या सोडून ऊस लागवड केली़ पहिल्याच प्रयोगात एकरी ८० टन ऊस उत्पादन मिळाले़ 

दरम्यान, त्यांनी सोयाबीन, हरभरा ही पारंपरिक पिके घेण्याबरोबरच अद्रकाचे उत्पादन घेतले़ तेव्हा हरभऱ्याला एकरी १४ क्विंटल व अद्रकाला एकरी दीडशे क्विंटल उतारा मिळाला होता़ ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच २००५ मध्ये तीन एकरांवर द्राक्ष लागवड केली़ त्यासाठी त्यांनी गावरान आणि हिरवळीच्या खताचा जास्तीत जास्त वापर केला़ त्यातून त्यांना १० लाखांचे उत्पन्न मिळाले़ त्यामुळे ते फळबागेकडे वळले़ आजघडीला ७ एकरवर केळी असून, त्यातून १० लाख, पाच एकर द्राक्षातून १० लाख, ३ एकर टरबुजातून ३ लाख, ३ एकर पपईतून ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे़ याशिवाय, ३ एकरवर टोमॅटो, १० एकरवर बेडवरील हरभरा, ३ एकरवर बडी ज्वारी आहे़ वर्षाकाठी खर्च वगळता ३० लाखांपर्यंत नफा होत असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़ त्यांच्या शेतात दीड कोटी लिटरचे शेततळेही खोदले आहे.

या आधुनिक प्रयोगाचे अनुकरण गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक शेतकरी करीत आहेत़ या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात़ या कार्याची दखल घेऊन शासनाने बाबासाहेब पाटील यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. पाटील यांनी जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घेतले आहे़ अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नगदी पीक असलेले ऊस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घेणे त्यांनी दोन वर्षांपासून बंद केले आहे़ वर्ष- दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये़ कोरडवाहू शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी बोर, सीताफळ अशा फळबागांची लागवड करावी़ त्यामुळे इतर पिकांच्या तुलेनत या फळांपासून अधिक उत्पन्न मिळते, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र