शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नगदी पिके न घेताही हेरचे शेतकरी मिळवतात लाखोचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:10 IST

यशकथा : अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नगदी पीक असलेले ऊस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घेणे त्यांनी दोन वर्षांपासून बंद केले आहे़

- हरी मोकाशे ( लातूर )

शिक्षक म्हणून उदगीर, (जि. लातूर) येथे नोकरी सुरू केली़ परंतु दहा महिन्यांतच नोकरीवर पाणी सोडले़ विदेशातील शेतीचे तंत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेती पाहून हेर (ता़ उदगीर) येथील शेतकरी बाबासाहेब पाटील यांनी शेतीत आधुनिक प्रयोग करण्यास सुरुवात केली़ त्याची फळेही मिळू लागली़ गावातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक प्रयोगाद्वारे चांगले उत्पन्न घेत आहेत़

हेर येथील बाबासाहेब बाळासाहेब पाटील यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे़ प्रारंभी ते शिक्षक म्हणून रुजू झाले़ परंतु संपूर्ण बालपणापासूनच शेतीची आवड होती़ त्यामुळे त्यांनी अवघे दहा महिने नोकरी करून शेतीकडे वळले़ एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या पाटील यांना ४५ एकर शेती आहे़ गावातील  जनावरांना चारण्याचे कुरण म्हणजे पाटील यांचे शेत, अशी ओळख होती़ सुरुवातीस त्यांनी पारंपरिक शेतीस सुरुवात केली़ परंतु त्यातून बहुतांश वेळा खर्चही पदरी पडत नव्हता़ त्यामुळे त्यांनी विदेशातील शेतीतंत्राची माहिती घेण्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक शेतीची पाहणी केली़  २००३ मध्ये ठिबक सिंचनचा अवलंब करून ६ फूट रुंदीच्या काकऱ्या सोडून ऊस लागवड केली़ पहिल्याच प्रयोगात एकरी ८० टन ऊस उत्पादन मिळाले़ 

दरम्यान, त्यांनी सोयाबीन, हरभरा ही पारंपरिक पिके घेण्याबरोबरच अद्रकाचे उत्पादन घेतले़ तेव्हा हरभऱ्याला एकरी १४ क्विंटल व अद्रकाला एकरी दीडशे क्विंटल उतारा मिळाला होता़ ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच २००५ मध्ये तीन एकरांवर द्राक्ष लागवड केली़ त्यासाठी त्यांनी गावरान आणि हिरवळीच्या खताचा जास्तीत जास्त वापर केला़ त्यातून त्यांना १० लाखांचे उत्पन्न मिळाले़ त्यामुळे ते फळबागेकडे वळले़ आजघडीला ७ एकरवर केळी असून, त्यातून १० लाख, पाच एकर द्राक्षातून १० लाख, ३ एकर टरबुजातून ३ लाख, ३ एकर पपईतून ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे़ याशिवाय, ३ एकरवर टोमॅटो, १० एकरवर बेडवरील हरभरा, ३ एकरवर बडी ज्वारी आहे़ वर्षाकाठी खर्च वगळता ३० लाखांपर्यंत नफा होत असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़ त्यांच्या शेतात दीड कोटी लिटरचे शेततळेही खोदले आहे.

या आधुनिक प्रयोगाचे अनुकरण गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक शेतकरी करीत आहेत़ या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात़ या कार्याची दखल घेऊन शासनाने बाबासाहेब पाटील यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. पाटील यांनी जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घेतले आहे़ अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नगदी पीक असलेले ऊस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घेणे त्यांनी दोन वर्षांपासून बंद केले आहे़ वर्ष- दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये़ कोरडवाहू शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी बोर, सीताफळ अशा फळबागांची लागवड करावी़ त्यामुळे इतर पिकांच्या तुलेनत या फळांपासून अधिक उत्पन्न मिळते, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र