शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला

By संदीप शिंदे | Updated: July 25, 2024 17:09 IST

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जळकोट : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी असून, शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. तर साठवण तलावातील मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. दरम्यान, गुरुवारी नदी नाल्यांना पूर आला असून, ढोरसांगवी- धनगरवाडी- ढोरसांगवी- जळकोटकडे जाणाऱ्या पुलावरुन काहीकाळ पाणी वाहिले. परिणामी, चार गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचा ओघ कमी झाल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली.

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील प्रशासनाकडे आहे. बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. तर गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील सोनवळा करंजी, रावणकोळा, माळहिपरगा, ढोरसांगवी, गुत्ती क्रमांक एक, क्रमांक दोन, जंगमवाडी, हळद वाढवणा, अतनूर, गव्हाण, मरसांगवी आदी साठवण तलावात ७० टक्के जलसाठा झाला असून आणखीन मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होतील. परिणामी, भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे. तालुक्यात जुलैअखेरपर्यंत पावसाने ५० टक्के सरासरी गाठली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सूर्यदर्शन नसल्याने पिकांना धोका...जळकोट तालुक्यात खरीपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. जवळपास १५ ते २० दिवसानंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे साठवण तलावात येवा वाढला असला तरी तीन दिवसांपासून सुर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्यापाठोपाठ कापूस आणि तुरीचा पेरा आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी...जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची मदार असून तालुका एक हंगामी खरिपाचा तालुका आहे. दरम्यान, पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नुकसानग्रस्त भागाची तहसील प्रशासन, कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

पावसाळ्यात तिरू नदीवर पुलाचे काम...तालुक्यातील तिरू नदीवर अतनूरनजीक नवीन पुलाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यायी पूल उभारण्यात आला. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेला असून, नवीन पूल उभारणीपर्यंत अतनूरसह विविध गावांचा रस्ता मार्गाने असलेला संपर्क खंडित राहणार आहे. ऐन पावसाळ्यात जुना पूल तोडून वाहतुकीचा खोळंबा केल्याबद्दल नागरिकांतून ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणी