शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला

By संदीप शिंदे | Updated: July 25, 2024 17:09 IST

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जळकोट : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी असून, शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. तर साठवण तलावातील मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. दरम्यान, गुरुवारी नदी नाल्यांना पूर आला असून, ढोरसांगवी- धनगरवाडी- ढोरसांगवी- जळकोटकडे जाणाऱ्या पुलावरुन काहीकाळ पाणी वाहिले. परिणामी, चार गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचा ओघ कमी झाल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली.

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील प्रशासनाकडे आहे. बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. तर गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील सोनवळा करंजी, रावणकोळा, माळहिपरगा, ढोरसांगवी, गुत्ती क्रमांक एक, क्रमांक दोन, जंगमवाडी, हळद वाढवणा, अतनूर, गव्हाण, मरसांगवी आदी साठवण तलावात ७० टक्के जलसाठा झाला असून आणखीन मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होतील. परिणामी, भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे. तालुक्यात जुलैअखेरपर्यंत पावसाने ५० टक्के सरासरी गाठली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सूर्यदर्शन नसल्याने पिकांना धोका...जळकोट तालुक्यात खरीपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. जवळपास १५ ते २० दिवसानंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे साठवण तलावात येवा वाढला असला तरी तीन दिवसांपासून सुर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्यापाठोपाठ कापूस आणि तुरीचा पेरा आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी...जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची मदार असून तालुका एक हंगामी खरिपाचा तालुका आहे. दरम्यान, पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नुकसानग्रस्त भागाची तहसील प्रशासन, कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

पावसाळ्यात तिरू नदीवर पुलाचे काम...तालुक्यातील तिरू नदीवर अतनूरनजीक नवीन पुलाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यायी पूल उभारण्यात आला. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेला असून, नवीन पूल उभारणीपर्यंत अतनूरसह विविध गावांचा रस्ता मार्गाने असलेला संपर्क खंडित राहणार आहे. ऐन पावसाळ्यात जुना पूल तोडून वाहतुकीचा खोळंबा केल्याबद्दल नागरिकांतून ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणी