शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरात पाण्याचे दुर्भिक्ष; ४९ गावे-वाड्या व्याकूळ, एकाच गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By हरी मोकाशे | Updated: January 24, 2024 17:36 IST

पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

लातूर : जिल्ह्यास महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत असून आता झळा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. त्यामुळे टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपर्यंतही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरीपातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. तसेच नाले, ओढे खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरीसपासून जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

अहमदपुरात सर्वाधिक पाण्याची समस्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ६औसा - ८निलंगा - ४रेणापूर - ३अहमदपूर -२५शिरुर अनं. - १उदगीर - १जळकोट - १एकूण - ४९

मंजुरीसाठी तहसील कार्यालयास २६ प्रस्ताव...जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५७ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पाहणीअंती ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले. दरम्यान, १७ गावे आणि ८ वाड्यांचे २६ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिग्रहण...गतवर्षी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मार्चमध्ये निर्माण झाली होती. जिल्ह्यात मार्चपासून अधिग्रहणास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जानेवारीअखेरीपासून अधिग्रहणास सुरुवात झाली आहे. यंदाचे पहिले अधिग्रहण उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा गावासाठी करण्यात आले आहे.

दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावास तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समिती आणि तहसीलदारांकडून पाहणी होईल. एक किमीच्या परिघात अधिग्रहणाची सोय नसल्यास टँकर सुरु होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा...प्रकल्प - उपयुक्त साठातावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.३५तिरु - ००देवर्जन - २४.५२साकोळ - ३४.८०घरणी - २३.६२मसलगा - ४३.२८एकूण - १७.०१

तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच १३४ साठवण तलावात ५७.४४१ दलघमी म्हणजे १८.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर