शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

अहमदपूरात पाण्याचे दुर्भिक्ष; ४९ गावे-वाड्या व्याकूळ, एकाच गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By हरी मोकाशे | Updated: January 24, 2024 17:36 IST

पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

लातूर : जिल्ह्यास महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत असून आता झळा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. त्यामुळे टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपर्यंतही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरीपातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. तसेच नाले, ओढे खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरीसपासून जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

अहमदपुरात सर्वाधिक पाण्याची समस्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ६औसा - ८निलंगा - ४रेणापूर - ३अहमदपूर -२५शिरुर अनं. - १उदगीर - १जळकोट - १एकूण - ४९

मंजुरीसाठी तहसील कार्यालयास २६ प्रस्ताव...जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५७ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पाहणीअंती ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले. दरम्यान, १७ गावे आणि ८ वाड्यांचे २६ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिग्रहण...गतवर्षी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मार्चमध्ये निर्माण झाली होती. जिल्ह्यात मार्चपासून अधिग्रहणास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जानेवारीअखेरीपासून अधिग्रहणास सुरुवात झाली आहे. यंदाचे पहिले अधिग्रहण उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा गावासाठी करण्यात आले आहे.

दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावास तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समिती आणि तहसीलदारांकडून पाहणी होईल. एक किमीच्या परिघात अधिग्रहणाची सोय नसल्यास टँकर सुरु होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा...प्रकल्प - उपयुक्त साठातावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.३५तिरु - ००देवर्जन - २४.५२साकोळ - ३४.८०घरणी - २३.६२मसलगा - ४३.२८एकूण - १७.०१

तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच १३४ साठवण तलावात ५७.४४१ दलघमी म्हणजे १८.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर