शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
4
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
5
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
6
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
7
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
8
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
9
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
10
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
11
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
12
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
13
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
14
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
15
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
16
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
18
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
19
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
20
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली

अहमदपूरात पाण्याचे दुर्भिक्ष; ४९ गावे-वाड्या व्याकूळ, एकाच गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By हरी मोकाशे | Updated: January 24, 2024 17:36 IST

पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

लातूर : जिल्ह्यास महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत असून आता झळा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. त्यामुळे टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपर्यंतही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरीपातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. तसेच नाले, ओढे खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरीसपासून जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

अहमदपुरात सर्वाधिक पाण्याची समस्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ६औसा - ८निलंगा - ४रेणापूर - ३अहमदपूर -२५शिरुर अनं. - १उदगीर - १जळकोट - १एकूण - ४९

मंजुरीसाठी तहसील कार्यालयास २६ प्रस्ताव...जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५७ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पाहणीअंती ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले. दरम्यान, १७ गावे आणि ८ वाड्यांचे २६ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिग्रहण...गतवर्षी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मार्चमध्ये निर्माण झाली होती. जिल्ह्यात मार्चपासून अधिग्रहणास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जानेवारीअखेरीपासून अधिग्रहणास सुरुवात झाली आहे. यंदाचे पहिले अधिग्रहण उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा गावासाठी करण्यात आले आहे.

दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावास तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समिती आणि तहसीलदारांकडून पाहणी होईल. एक किमीच्या परिघात अधिग्रहणाची सोय नसल्यास टँकर सुरु होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा...प्रकल्प - उपयुक्त साठातावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.३५तिरु - ००देवर्जन - २४.५२साकोळ - ३४.८०घरणी - २३.६२मसलगा - ४३.२८एकूण - १७.०१

तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच १३४ साठवण तलावात ५७.४४१ दलघमी म्हणजे १८.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर