शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा

By हरी मोकाशे | Updated: April 17, 2024 19:00 IST

पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण 

लातूर : तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचल्याने जीवाची काहिली होती आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. दरम्यान, अवैधरित्या पाणीउपसा रोखण्यासाठी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. काही गावांनी तर हिवाळ्याच्या अखेरीसच अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले. तद्नंतर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यापासून तर रविराजा राैद्ररुप धारण करु लागल्याने दुपारच्या वेळी जीवाची काहिली होत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे सकाळी ११ वा. पासून रस्त्यावरील वाहतूक अत्यंत कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. उन्ह वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जलसाठा झपाट्याने खालावत आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक साठा...प्रकल्प - जलसाठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ६.७१तिरु - ००देवर्जन - ८.५१साकोळ - १३.७०घरणी - ९.४२मसलगा - २१.४५एकूण - ७.२२

प्रत्यक्षात उपयुक्त साठा ८ दलघमी...सध्या जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपयुक्त साठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात १.३८०, देवर्जनमध्ये ०.९०९, साकोळमध्ये १.५००, घरणीत २.११७ तर मसलगा मध्यम प्रकल्पात २.९१७ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. एकूण ८.८२३ दलघमी पाणी शिल्लक आहे.

लघु तलावात ९ टक्के पाणी...जिल्ह्यात एकूण १३४ लघु तलाव आहेत. त्यामध्ये सध्या २९.१५२ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची ९.२८ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, तिरु हे तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.

जिल्ह्यातील १६८ गावांना अधिग्रहणाचे पाणी...सध्या जिल्ह्यातील ३०१ गावे आणि ५१ वाड्या अशा एकूण ३५२ गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४८३ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १६८ गावांना १८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मंजुरीसाठी २१५ गावांचे आणि ३९ वाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.

१० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...जिल्ह्यातील २३ गावे आणि ३ वाड्या अशा एकूण २६ गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी १० गावांना १० टँकर मंजूर करण्यात येऊन ते सुरु करण्यात आले आहेत.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर