शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा

By हरी मोकाशे | Updated: April 17, 2024 19:00 IST

पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण 

लातूर : तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचल्याने जीवाची काहिली होती आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. दरम्यान, अवैधरित्या पाणीउपसा रोखण्यासाठी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. काही गावांनी तर हिवाळ्याच्या अखेरीसच अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले. तद्नंतर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यापासून तर रविराजा राैद्ररुप धारण करु लागल्याने दुपारच्या वेळी जीवाची काहिली होत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे सकाळी ११ वा. पासून रस्त्यावरील वाहतूक अत्यंत कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. उन्ह वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जलसाठा झपाट्याने खालावत आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक साठा...प्रकल्प - जलसाठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ६.७१तिरु - ००देवर्जन - ८.५१साकोळ - १३.७०घरणी - ९.४२मसलगा - २१.४५एकूण - ७.२२

प्रत्यक्षात उपयुक्त साठा ८ दलघमी...सध्या जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपयुक्त साठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात १.३८०, देवर्जनमध्ये ०.९०९, साकोळमध्ये १.५००, घरणीत २.११७ तर मसलगा मध्यम प्रकल्पात २.९१७ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. एकूण ८.८२३ दलघमी पाणी शिल्लक आहे.

लघु तलावात ९ टक्के पाणी...जिल्ह्यात एकूण १३४ लघु तलाव आहेत. त्यामध्ये सध्या २९.१५२ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची ९.२८ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, तिरु हे तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.

जिल्ह्यातील १६८ गावांना अधिग्रहणाचे पाणी...सध्या जिल्ह्यातील ३०१ गावे आणि ५१ वाड्या अशा एकूण ३५२ गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४८३ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १६८ गावांना १८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मंजुरीसाठी २१५ गावांचे आणि ३९ वाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.

१० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...जिल्ह्यातील २३ गावे आणि ३ वाड्या अशा एकूण २६ गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी १० गावांना १० टँकर मंजूर करण्यात येऊन ते सुरु करण्यात आले आहेत.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर