शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा

By हरी मोकाशे | Updated: April 17, 2024 19:00 IST

पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण 

लातूर : तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचल्याने जीवाची काहिली होती आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. दरम्यान, अवैधरित्या पाणीउपसा रोखण्यासाठी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. काही गावांनी तर हिवाळ्याच्या अखेरीसच अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले. तद्नंतर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यापासून तर रविराजा राैद्ररुप धारण करु लागल्याने दुपारच्या वेळी जीवाची काहिली होत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे सकाळी ११ वा. पासून रस्त्यावरील वाहतूक अत्यंत कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. उन्ह वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जलसाठा झपाट्याने खालावत आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक साठा...प्रकल्प - जलसाठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ६.७१तिरु - ००देवर्जन - ८.५१साकोळ - १३.७०घरणी - ९.४२मसलगा - २१.४५एकूण - ७.२२

प्रत्यक्षात उपयुक्त साठा ८ दलघमी...सध्या जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपयुक्त साठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात १.३८०, देवर्जनमध्ये ०.९०९, साकोळमध्ये १.५००, घरणीत २.११७ तर मसलगा मध्यम प्रकल्पात २.९१७ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. एकूण ८.८२३ दलघमी पाणी शिल्लक आहे.

लघु तलावात ९ टक्के पाणी...जिल्ह्यात एकूण १३४ लघु तलाव आहेत. त्यामध्ये सध्या २९.१५२ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची ९.२८ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, तिरु हे तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.

जिल्ह्यातील १६८ गावांना अधिग्रहणाचे पाणी...सध्या जिल्ह्यातील ३०१ गावे आणि ५१ वाड्या अशा एकूण ३५२ गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४८३ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १६८ गावांना १८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मंजुरीसाठी २१५ गावांचे आणि ३९ वाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.

१० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...जिल्ह्यातील २३ गावे आणि ३ वाड्या अशा एकूण २६ गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी १० गावांना १० टँकर मंजूर करण्यात येऊन ते सुरु करण्यात आले आहेत.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर