शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जलस्त्रोत आटले; लातूर जिल्ह्यातील सव्वातीनशे गावे तहानली!

By हरी मोकाशे | Updated: April 8, 2024 17:58 IST

टंचाईची दाहकता वाढली : दीडशे गावांना अधिग्रहणाचे पाणी

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्याचबरोबर विहिरी, कुपनलिका आटू लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची दाहकता अधिक वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२२ गावे तहानली असून ४३६ अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी १५२ गावांना १७० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. शिवाय, परतीचाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम प्रकल्पांसह विहिरीच्या पाणी पातळीत पुरेशा प्रमाणात वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवणार असे गृहित धरीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनात्मक आराखडे तयार करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या उन्हाबरोबर बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे.

अहमदपुरातील ७९ गावांत टंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ७३रेणापूर - ३०अहमदपूर - ७९चाकूर - १९शिरुर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११एकूण - ३२२

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक अधिग्रहणे...जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४३६ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करुन १९ गावांचे ३८ प्रस्ताव वगळले आहेत. २४१ गावांचे २९३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२४ गावे आणि २८ वाड्यांचे असे एकूण १५२ गावांचे १७० अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली...जिल्ह्यातील १९ गावे आणि एक वाडीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी १२ गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करण्यात आले असता त्यातील ९ गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर...औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. तालुक्यातील लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णीसही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फुलसेवाडीस टँकर मंजूर करण्यात आले आहे. जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारे तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी या गावांना टँकरची प्रतीक्षा लागून आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर