शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

लसीचा पुरवठा कमी झाल्याने ३४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST

लातूर : ‘मागणी तसा पुरवठा’ होत नसल्याने लसीकरणाला जिल्ह्यात खिळ बसत आहे. त्यामुळेच १७१ पैकी ३४ केंद्रांवर मंगळवारी लसीकरणाचे ...

लातूर : ‘मागणी तसा पुरवठा’ होत नसल्याने लसीकरणाला जिल्ह्यात खिळ बसत आहे. त्यामुळेच १७१ पैकी ३४ केंद्रांवर मंगळवारी लसीकरणाचे काम ठप्प होते. केवळ १३७ केंद्रांवर लस देण्यात आली. मागील दोन-तीन दिवस तर पुरवठा ठप्प झाल्याने अनेक केंद्रे बंद होती. आता १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याने ती सक्षम पद्धतीने मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

४५ वर्षांपुढील ८ लाख ५१ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यात आतापर्यंत २ लाख ३२ हजार १५४ डोस दिले गेले आहेत. त्यातील पहिला डोस २ लाख ३ हजार ७२३ जणांनी घेतला आहे तर २८ हजार ४३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पुरवठा सुरळीत आणि नियमित मागणीनुसार झाला असता तर टक्केवारी वाढली असती. परंतु, मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने २३ टक्के लसीकरण झाले आहे. उद्दिष्ट ८ लाख ५१ हजार पात्र लाभार्थ्यांचे असताना २ लाख ३ हजार ७२३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा झाला तर पूर्ण क्षमतेने लसीकरण होणार आहे.

१ मे नंतरचे नियोजन काय...

१ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. त्यानुसार खासगी सेंटर वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोविन पोर्टलवर अर्ज घेण्यात येत आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर संबंधित केंद्र चालकांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.

लसीचा पुरवठा मागणीप्रमाणे झाला तर दररोज १५ ते २० हजार डोसेस देण्याची क्षमता यंत्रणेकडे आहे. दहा ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, २५२ उपकेंद्र आहेत. या सर्व संस्थांत लसीकरण देता येऊ शकेल.