शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

स्थानिक राजकारणाने विहीर, जलकुंभांसाठी जागा मिळेना; जलजीवन मिशनची कामे होणार रद्द

By हरी मोकाशे | Updated: March 2, 2024 16:42 IST

कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे.

लातूर : प्रत्येक कुटुंबास दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर, जलकुंभासाठी जागा मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने ही विहीर, जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने सन २०२१ पासून जलजीवन मिशन सुरू करण्यात आले. प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना घरपोच, पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. विशेषत: २० पेक्षा अधिक कुटुंब संख्या असलेल्या वाडी-तांड्यावरील नागरिकांनाही घरपोच नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, वाडी-तांड्यांसाठी एकूण ९२८ कामे मंजूर करण्यात आली. ती वर्षाच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे.

स्थानिक राजकारणाने जागेचा तिढा सुटेना...जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर खोदण्यासाठी, तसेच जलकुंभ उभारण्यासाठी जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. मात्र, गाव पातळीवरील स्थानिक राजकारणाचा अडसर निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्य शासनाने विहीर आणि जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही...जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ९२८ कामे हाती घेण्यात आली असली तरी आतापर्यंत १९१ कामे पूर्ण झाली आहेत. १०१ कामे ७५ टक्क्यांच्या वर आहेत. १८३ कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. २४९ कामे २५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत, तर १८६ कामे २५ टक्क्यांच्या आत आहेत. १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - पूर्ण कामे - अद्याप सुरू नसलेली कामेअहमदपूर - ३० - ००औसा - ४४ - ०२चाकूर - १८ - ००देवणी - ०५ - ०६जळकोट - ०५ - ००लातूर - १३ - ०१निलंगा - ३४ - ०४रेणापूर - १६ - ००शिरूर अनं. - ०४ - ०४उदगीर - २२ - ०१एकूण - १९१ - १८

दंड आकारून कामास मुदतवाढ...जलजीवन मिशनअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून कंत्राटदारांकडून आढावा घेतला जात आहे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करीत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच काही दिवसांपूर्वी कंत्राटदारांकडील पाच कामेही काढून घेण्यात आली आहेत.

अन्यथा योजना रद्द करण्याची शिफारस...विहीर, जलकुंभासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने काही कामे सुरू झाली नाहीत. दरम्यान, शासनाने ही कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतींना माहिती देण्यात आली आहे. आठवडाभरात जागा उपलब्ध करुन न दिल्यास योजना रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा

टॅग्स :laturलातूरWaterपाणी