शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

स्थानिक राजकारणाने विहीर, जलकुंभांसाठी जागा मिळेना; जलजीवन मिशनची कामे होणार रद्द

By हरी मोकाशे | Updated: March 2, 2024 16:42 IST

कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे.

लातूर : प्रत्येक कुटुंबास दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर, जलकुंभासाठी जागा मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने ही विहीर, जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने सन २०२१ पासून जलजीवन मिशन सुरू करण्यात आले. प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना घरपोच, पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. विशेषत: २० पेक्षा अधिक कुटुंब संख्या असलेल्या वाडी-तांड्यावरील नागरिकांनाही घरपोच नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, वाडी-तांड्यांसाठी एकूण ९२८ कामे मंजूर करण्यात आली. ती वर्षाच्या कालावधीत केवळ १९१ कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे.

स्थानिक राजकारणाने जागेचा तिढा सुटेना...जिल्ह्यातील १५ गावांमध्ये विहीर खोदण्यासाठी, तसेच जलकुंभ उभारण्यासाठी जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. मात्र, गाव पातळीवरील स्थानिक राजकारणाचा अडसर निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्य शासनाने विहीर आणि जलकुंभाची कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही...जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ९२८ कामे हाती घेण्यात आली असली तरी आतापर्यंत १९१ कामे पूर्ण झाली आहेत. १०१ कामे ७५ टक्क्यांच्या वर आहेत. १८३ कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. २४९ कामे २५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत, तर १८६ कामे २५ टक्क्यांच्या आत आहेत. १८ कामांना अद्यापही प्रारंभ नाही.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - पूर्ण कामे - अद्याप सुरू नसलेली कामेअहमदपूर - ३० - ००औसा - ४४ - ०२चाकूर - १८ - ००देवणी - ०५ - ०६जळकोट - ०५ - ००लातूर - १३ - ०१निलंगा - ३४ - ०४रेणापूर - १६ - ००शिरूर अनं. - ०४ - ०४उदगीर - २२ - ०१एकूण - १९१ - १८

दंड आकारून कामास मुदतवाढ...जलजीवन मिशनअंतर्गतची कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून कंत्राटदारांकडून आढावा घेतला जात आहे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करीत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच काही दिवसांपूर्वी कंत्राटदारांकडील पाच कामेही काढून घेण्यात आली आहेत.

अन्यथा योजना रद्द करण्याची शिफारस...विहीर, जलकुंभासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने काही कामे सुरू झाली नाहीत. दरम्यान, शासनाने ही कामे वगळून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतींना माहिती देण्यात आली आहे. आठवडाभरात जागा उपलब्ध करुन न दिल्यास योजना रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा

टॅग्स :laturलातूरWaterपाणी