शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 5:38 PM

शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी व्यापा-यांकडून मागणी आहे.

ठळक मुद्देआज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. दिवसभरात १० लाखांची उलाढाल ठप्प

उदगीर : शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी येथील व्यापा-यांकडून मागणी आहे. यातच आज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे दिवसभरात जवळपास १० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.

शहरातील पत्तेवार चौक व परिसरात हातगाडे थांबतात़ त्याचबरोबर अतिक्रमणांनी विळखा घातला आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करणा-या अबालवृध्दांना त्याचा त्रास होत आहे़ अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना होत आहे़ सन २०११ मध्ये पत्तेवार चौकातील व्यापा-यांनी या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची चौकी उभारावी अशी मागणी केली होती़ परंतु, ती अद्यापही पूर्ण झाली नाही. या चौक परिसरात किराणा, भुसार, मेडिकल, भांडी, गृहउपयोगी वस्तू ते भाजीपाल्याची बाजारपेठ आहे़ त्यामुळे खरेदीसाठी अबालवृद्धांची नेहमी गर्दी असते़ या परिसरात सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्तीसंदर्भात ‘लोकमत’मधून यापूर्वी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्यामुळे आमदार सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे आदींनी पुढाकार घेऊन या भागातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती़ परंतु, नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यात एकी न झाल्याने ही मोहीम थंडावली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक व्यापारी व एका हातगाडेचालकात वाद होऊन बाचाबाची झाली़ त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी अतिक्रमणे व हातगाडे हटवावेत, अशी मागणी करीत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यास सुरुवात केली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे व नगर परिषदेचे अधिकारी गोलंदाज यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन व्यापाºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, व्यापाºयांनी आपण माघार घेत नसल्याचे स्पष्ट करीत निवेदन दिले़ या भागातील हातगाडे, अतिक्रमणे हटवावीत, सेंट्रल पार्किंग बंद करावी, रस्ते खुले करावेत, अशा मागण्या व्यापा-यांनी केल्या आहेत़

अतिक्रमणांमुळे व्यापा-यांत असुरक्षिततेची भावना़या भागात पोलीस मदत केंद्र निर्माण करावे, अशी आम्ही सन २०११ पासून मागणी करीत आहोत़ तसेच हातगाडे थांबत असल्याने आणि अतिक्रमणे वाढल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे़ व्यापारीही त्रस्त झाले आहेत़ पोलीस मदत केंद्रासंदर्भात पोलीस महासंचालकांपर्यंत मागणी करण्यात आली होती़ याच मागणीसाठी १८ ते २० आॅगस्ट २०११ या कालावधीत बाजारपेठ बंदही ठेवण्यात आली होती, असे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी रामदास जळकोटे यांनी सांगितले़ 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवू़शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषद कटिबध्द आहे़ शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीमही सुरु करण्यात आली होती़ परंतु, वेळेवर पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम थंडावली़ आता पुन्हा मोहीम सुरु करण्यात येईल, असे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी सांगितले़ दरम्यान, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेला सर्व सहकार्य केले जाईल.