शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: March 25, 2024 18:49 IST

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

लातूर : हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली असून, औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून कत्ती आणि काठी जप्त केली आहे.

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अपर  पोलिस अधीक्षक  डॉ. अजय देवरे, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याची माहिती काढत होते. दरम्यान, खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे औसा शहरातील याकतपूर मोड परिसरात दोघा तरुणांना हातात धारदार कत्ती आणि काठी घेऊन दहशत निर्माण करत फिरताना सोमवारी अटक करण्यात आली. 

रसूल खय्युम शेख (वय २८, रा. कव्वा नाका, लातूर) आणि लखन कैलास रणदिवे ( वय ३२, रा. माताजी नगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलिस अंमलदार वाडकर, डीगे, हिंगणे, होगाडे, पाटील यांच्या पथकाने केली आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अन्यबोईनवाड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी