शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लातूर शहरात दररोज दोनशे टन नवा कचरा; विल्हेवाट नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग

By हणमंत गायकवाड | Updated: April 1, 2024 19:39 IST

तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन आणि जनाधार संस्थेची संयुक्त बैठक

लातूर : शहरात दररोज २०० टन नवा कचरा निर्माण होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मनपा प्रशासन आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेची संयुक्त बैठक नुकतीच झाली असून आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आठ दिवसांत साफ करण्यासंदर्भात संस्थेला सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने काम करायला प्रारंभ झाला आहे.

लातूर शहरामध्ये ७८ हजार मालमत्ताधारकांची संख्या होती. ती आता सव्वालाखाच्या घरात गेली आहे. ४८ हजार घरे वाढीव झाली आहेत. यामुळे कचरा वाढला आहे. कचरा वाढल्यामुळे व्यवस्थापन संस्थेवरचा ताण वाढला आहे. ज्या तुलनेत कचरा वाढला. त्या तुलनेत संस्थेकडे मनुष्यबळाची वाढ झालेली नाही. परिणामी, शहरातील कचरा उचलताना अनियमित आली आहे. यामुळे कचरा उचलणारी संस्था आणि मनपा प्रशासनात वाद निर्माण झाला होता.

गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेत साचला कचरा... लातूर शहरानजीक गेलेल्या रिंगरोड तसेच बार्शी रोडच्या समांतर रस्त्यावर, दयानंद महाविद्यालयाच्या बाजूने असलेल्या भाजीपाल्याच्या रयतू बाजारात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेतही कचरा साचलेला आहे. कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरही कारवाईसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहेत; पण त्याआगोदर घरोघरी निर्माण होणारा कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे.

आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देशशहरातला कचरा संकलन करताना अडचणी आल्या होत्या; मात्र आता त्या दूर झाल्या असून, संबंधित संस्थेला आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश बैठक घेऊन देण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाबाबतचे निवडणुकीनंतर त्याबाबतची प्रक्रिया होऊ शकते. प्राप्त स्थितीत जुन्या संस्थेकडे कचरा व्यवस्थापनाचे काम आहे.- रमाकांत पिडगे, स्वच्छता विभागप्रमुख मनपा

आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावरआठ हजार रुपये वेतनावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आमच्या काही मागण्या महानगरपालिका प्रशासनाकडे होत्या. त्यातील काही मागण्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शहरात कचरा वाढलेला आहे. त्याबाबतचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाईल. आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावर येईल.- संजय कांबळे, जनाधार संस्था, लातूर

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका