शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दहावीमध्ये जुळ्या भावंडांना जुळे गुण! शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ठरले गुणवंत...

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2023 21:39 IST

दोघा भावंडांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत.

लातूर : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेल्या अजय आणि विजय राडकर या जुळ्या भावंडांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्यांनी गुणही जुळेच मिळविले आहेत. दोघा भावंडांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत.

परळी वैजनाथ येथील राडकर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. वडील केशवराव राडकर यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. ते शेती करून आपल्या मुलांना अधिकारी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. यासाठी त्यांनी शिक्षणासाठी आपल्या जुळ्या मुलांना लातुरातील जयक्रांती माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीसाठी प्रवेश दिला. यासाठी त्यांनी लातुरात भाड्याची खोली करून दिली आणि खानावळही लावली. 

दोघेही नित्यनेमाने शाळेत येत असत. दोघेही दररोज अभ्यास करीत असत. काही अडचण असेल तर शिक्षकांच्या मोबाइलवरून वडिलांशी बोलत असत. मात्र, त्यांनी मोबाइल वापरण्याचे कटाक्षाने टाळले. त्यांच्या आवडी-निवडी सारख्या, लहानपणापासून अभ्यासात हुशार...यंदा त्यांनी दहावीची परीक्षा दिली. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जुळ्या असलेल्या अजय आणि विजय यांनी ९७ टक्के जुळेच गुण मिळविले आहे, असे सहशिक्षक गणपत माने यांनी सांगितले. यशाबद्दल त्यांचे संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

स्वंयशिस्तीमुळेच सिद्ध झाली गुणवत्ता...लातुरात भाड्याची खोली करून देत वडिलांनी जुळ्या असलेल्या अजय आणि विजयला शिक्षणासाठी ठेवले होते. दररोज ते एकत्र शाळेत जायचे. भोजनासाठीही खानावळीवर एकत्रच जात असत. खोलीवर घरातला वडीलधारी व्यक्ती नाही. अशा स्थितीतही त्यांनी स्वत:साठी स्वंयशिस्त महत्त्वाची आहे, ही खूणगाठ बांधली. याच स्वयंशिस्तीने त्यांनी दहावीत ९७ टक्के गुण मिळवीत गुणवंत ठरले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर