दिल्ली आंदोलनातील मयत शेतकऱ्यांना उदगीरात श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST2020-12-22T04:19:26+5:302020-12-22T04:19:26+5:30
केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके तात्काळ रद्द करावीत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...

दिल्ली आंदोलनातील मयत शेतकऱ्यांना उदगीरात श्रध्दांजली
केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके तात्काळ रद्द करावीत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी काही शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मेणबत्ती पेटवून शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, अजित शिंदे, समीर शेख, अजीम दायमी, मंजूरखाॅ पठाण, अमोल कांडगिरे, चंद्रकांत टेंगेटोल, शमशुद्दीन जरगर, फय्याज शेख, माजी नगरसेवक अहमद सरवर, सुनील सावळे, सय्यद जॉनी, नवनाथ गायकवाड, वसी हाश्मी, श्रीनिवास एकुर्केकर, राजकुमार अतनुरे, सिद्धेश्वर लांडगे, विनोद सुडे, श्रीरंग कांबळे, अश्फाक शेख, जावेद बागवान, मुकेश भालेराव, सतीश पाटील मानकीकर, नागेश पटवारी, सद्दाम बागवान, आदर्श पिंपरे आदी उपस्थित होते.
***