हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काळी-पिवळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:19+5:302021-09-21T04:22:19+5:30
गत काही दिवसांपासून लातूर-मुंबई आणि बिदर-मुंबई या दाेन रेल्वे गाड्यांना प्रवासीसंख्या वाढली आहे. विशेषत: नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागरपूर, हैदराबाद-हडपसर आणि ...

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काळी-पिवळी !
गत काही दिवसांपासून लातूर-मुंबई आणि बिदर-मुंबई या दाेन रेल्वे गाड्यांना प्रवासीसंख्या वाढली आहे. विशेषत: नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागरपूर, हैदराबाद-हडपसर आणि लातूर - यशवंतपूर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
रेल्वेने आम्ही लातूर ते मुंबई रेल्वेने प्रवासाला निघालाे. उदगीरहून तिकीट उपलब्ध न झाल्याने लातूर येथून या रेल्वेचे तिकीट आरक्षित केले आहे. लातूर येथून प्रवासाला निघालाे. मात्र, रेल्वेला माेठ्या प्रमाणावर गर्दी आहे.
-गणपतराव लातूरकर
बिदर-मुंबई या रेल्वेने मुंबईकडे आम्ही प्रवासाला निघालाे. मुंबईमध्ये राेजगारानिमित्त आम्ही स्थायिक झालाे आहाेत. चाकूर येथून तिकीट मिळाले नाही. त्यासाठी लातूर येथून तिकीट आरक्षित केले आहे. सध्याला रेल्वेला माेठी गर्दी आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करणे आता कठीण आहे. - पांडुरंग चाकूरकर
विक्रेत्यांचीच गर्दी जास्त...
लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या सर्वच रेल्वेंना विक्रेत्यांचीही गर्दी वाढली आहे. सध्याला दिवसेंदिवस प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे. आरक्षणाशिवाय अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. एका डब्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काळी-पिवळी, असा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे.