शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत

By हरी मोकाशे | Updated: March 18, 2024 18:15 IST

गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.

लातूर : प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जलस्रोतांची तपासणी केली जाते. काही वेळेस ही तपासणी विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस पाणी नमुने तपासणी संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आता गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे.

बहुतांश आजार हे पिण्याच्या पाण्यातून उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकाने शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, गावास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून दक्षता घेतली जाते. दरम्यान, ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी गावातील जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणीसाठी जिल्हास्तरीय प्रयोगशाळेकडे पाठवितात. बहुतांश वेळा तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर नमुने प्रयोगशाळेत येत नाहीत. परिणामी, तपासणीवर परिणाम होतो. अशी समस्या उद्भवू नये म्हणून पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आता गावातच जलस्रोतांची तपासणी हाेणार आहे.

पाण्याची रासायनिक अन् जैविक तपासणी होणार...जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत रासायनिक आणि जैविक अशा पद्धतीने जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. आता हीच तपासणी गाव पातळीवर केली जाणार आहे. त्यासाठी जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडे तपासणी किट उपलब्ध करण्यात आले आहेत. ते लवकरच गाव पातळीवर वितरित केले जाणार आहेत.

तपासणी किटसाठी ३७ लाखांचा खर्च...पाणी तपासणी किटसाठी एकूण ३६ लाख ९४ हजारांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यात जैविक संचासाठी ९ लाख २८ हजार तर रासायनिक किटसाठी २७ लाख ६६ हजारांचा निधी आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

तपासणीचे लवकरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण...गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. तपासणीचे लवकरच या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक स्रोताच्या तपासणीकरिता काही मानधनही दिले जाणार आहे.

दर महिन्यास तपासणी आवश्यक...पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात नळाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नमुने, शाळा- अंगणवाड्यांतील जलस्रोतांचे नमुने घेऊन त्याची प्रत्येक महिन्यास रासायनिक आणि जैविक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होते.

उपाययोजना करण्यास मदत...लवकरच गाव पातळीवर जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तपासणी किट वितरित केली जाणार आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजेल आणि तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होईल.- मोहन अभंगे, डेप्युटी सीईओ.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरgram panchayatग्राम पंचायत