शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत

By हरी मोकाशे | Updated: March 18, 2024 18:15 IST

गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.

लातूर : प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जलस्रोतांची तपासणी केली जाते. काही वेळेस ही तपासणी विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस पाणी नमुने तपासणी संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आता गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे.

बहुतांश आजार हे पिण्याच्या पाण्यातून उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकाने शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, गावास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून दक्षता घेतली जाते. दरम्यान, ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी गावातील जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणीसाठी जिल्हास्तरीय प्रयोगशाळेकडे पाठवितात. बहुतांश वेळा तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर नमुने प्रयोगशाळेत येत नाहीत. परिणामी, तपासणीवर परिणाम होतो. अशी समस्या उद्भवू नये म्हणून पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आता गावातच जलस्रोतांची तपासणी हाेणार आहे.

पाण्याची रासायनिक अन् जैविक तपासणी होणार...जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत रासायनिक आणि जैविक अशा पद्धतीने जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. आता हीच तपासणी गाव पातळीवर केली जाणार आहे. त्यासाठी जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडे तपासणी किट उपलब्ध करण्यात आले आहेत. ते लवकरच गाव पातळीवर वितरित केले जाणार आहेत.

तपासणी किटसाठी ३७ लाखांचा खर्च...पाणी तपासणी किटसाठी एकूण ३६ लाख ९४ हजारांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यात जैविक संचासाठी ९ लाख २८ हजार तर रासायनिक किटसाठी २७ लाख ६६ हजारांचा निधी आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

तपासणीचे लवकरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण...गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. तपासणीचे लवकरच या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक स्रोताच्या तपासणीकरिता काही मानधनही दिले जाणार आहे.

दर महिन्यास तपासणी आवश्यक...पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात नळाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नमुने, शाळा- अंगणवाड्यांतील जलस्रोतांचे नमुने घेऊन त्याची प्रत्येक महिन्यास रासायनिक आणि जैविक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होते.

उपाययोजना करण्यास मदत...लवकरच गाव पातळीवर जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तपासणी किट वितरित केली जाणार आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजेल आणि तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होईल.- मोहन अभंगे, डेप्युटी सीईओ.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरgram panchayatग्राम पंचायत