शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

आरटीई प्रवेशासाठी जुन्याच पद्धतीने होणार प्रक्रिया; पुन्हा अर्ज भरताना 'या' बाबी आहेत आवश्यक...

By संदीप शिंदे | Updated: May 17, 2024 16:52 IST

शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहेत.

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पद्धतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी १७ मेपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, ३१ मेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत नवीन नियमानुसार जिल्हा परिषद, मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इंग्रजी शाळांचा पर्याय येत नव्हता. विशेष म्हणजे १७०० हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती. यात २२ हजार जागा भरल्या जाणार होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १२०० अर्ज या प्रक्रियेसाठी दाखल झाले होते. त्यातच शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी १७ मे अर्थात शुक्रवारपासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. ३१ मेपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याची संधी जुन्या नियमामुळे मिळणार आहे. दरम्यान, स्वंय अर्थसहायित शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया पार पाडली असून, आता शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहेत.

पोर्टलवर २१४ शाळांत १८५७ जागा...आरटीई पोर्टलवर जुन्या नियमानुसार दाखविण्यात येणाऱ्या शाळा, जागांची माहिती हटविण्यात आली असून, नवीन माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडे २१४ शाळांनी नोंदणी केली असून, यामध्ये १ हजार ८५७ जागा भरण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत किती अर्ज येणार याकडे लक्ष असून, त्यानंतरच राज्यस्तरावरुन सोडत काढण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सुचनाही आल्या असल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

पालकांना पुन्हा अर्ज करावा लागणार...नवीन नियमानुसार आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत होती. यामध्ये २२ हजार जागांसाठी केवळ १२०० अर्ज आले होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत असून, पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत. ३१ मेपर्यंत मुदत असून, निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये १ हजार ८५७ जागांवर प्रवेश होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया...आरटीई प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनानुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे. शाळा सुरु होण्यपूर्वी प्रक्रिया राबविण्याचे आव्हान आहे.

अर्ज भरताना या बाबी आहेत आवश्यक...आर्थिक वर्षांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांचा दुर्बल घटकात समावेश होतो. प्रवेश प्रक्रियेकरता अर्ज भरताना १० शाळांची निवड करावी, अर्ज परिपूर्ण भरावा, शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपकडून निश्चित करण्यात आलेले आहे. अर्जाबाबत काही तक्रार असल्यास पोर्टलवर स्वतंत्र साईड देण्यात आली आहे. निवासी पूरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूरEducationशिक्षण