शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

दर गडगडले, संतप्त शेतकऱ्याने जनावरांच्या दावणीला टाकले टोमॅटो!

By हरी मोकाशे | Updated: November 10, 2022 17:30 IST

२० किलोच्या कॅरेटला १०० ते २५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत

वडवळ ना. (जि. लातूर) : बाजारपेठेत टोमॅटोचे दर कोसळल्याने तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही पदरी पडत नसल्याने चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. एवढेच नव्हे तर काही शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकत आहे. सध्या बाजारात टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला शंभर ते अडीचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरातील बहुतांश शेतकरी फुलकोबी, पत्ता कोबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, काकडी, कारले आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. जवळपास ४०० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड असते. यात ७०० पेक्षा अधिक जास्त एकरवर टाेमॅटोची लागवड असते. येथील टोमॅटोला हैदराबाद, विदर्भ, पुणे, मुंबई, बेंगलोर, नाशिकसह परराज्यात मागणी असते. तसेच दरवर्षी भावही चांगला मिळतो.यंदाही येथील शेतकऱ्यांनी जूनमध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यानंतर खत टाकणे, बांबू रोवणे, तारा ओढणे, फवारणी अशी कामे केली. सध्या टोमॅटो तोडणीसाठी आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी करुन बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवित आहेत. परंतु, बाजारात २० किलोच्या कॅरेटला १०० ते २५० रुपयांपर्यत भाव मिळत आहे. त्यातून तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तोडणीही बंद केली आहे. तर काही शेतकरी शेतातील टोमॅटो जनावरांच्या दावणीला चारा म्हणून टाकत आहेत.

एकरी लाखापर्यंत खर्च...टोमॅटो लागवडीपासून ते उत्पादन निघेपर्यंत शेतकऱ्यांचा एकरी लाखापर्यंत खर्च होतो. एका एकरातून किमान ६० टन उत्पादन अपेक्षित असते. यंदा अपेक्षित उत्पादन मिळत असले तरी बाजारपेठेत दर कमी असल्याने टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत कॅरेटला २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.

भावच नसल्याने अडचण...मी जूनमध्ये ८ एकरवर टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी आतापर्यंत जवळपास ६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. सध्या टोमॅटो तोडणीस आला आहे. परंतु, बाजारात भाव नाही. त्यामुळे सध्या तोडणीच बंद केली आहे. कारण तोडणी, वाहतुकीचा खर्च परवडत नाही.- नूर पटेल, शेतकरी.

गेल्या वर्षी दसऱ्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोच्या एका कॅरेटला २२०० रुपये भाव होता. त्यामुळे आम्ही जूनमध्ये चार एकरवर लागवड केली. आता खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे मोठी चिंता लागली आहे.- गंगाधर वडिले, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी