शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

By राजकुमार जोंधळे | Updated: May 21, 2025 07:44 IST

मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले.

लातूर : नांदेड जिल्ह्यातील मंग्याळ (ता. मुखेड) येथील मुळची असलेली गायत्री विष्णुकांत इंद्राळे (वय १७) हिने आत्महत्या करण्यापूर्वी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावाकडे आईला काॅल केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. गायत्री आईला म्हणाली, आतापर्यंतचे सर्व पेपर चांगले गेले असून, मी उद्या बुधवारी दुपारपर्यंत गावाकडे येणार आहे. हा संवाद गायत्री आणि तिच्या आईचा शेवटचा ठरला.

मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. सकाळी आईशी माेकळेपणाने संवाद साधलेल्या गायत्रीने अचानकपणे दुपारी मध्येच पेपर साेडून वसतिगृहात का दाखल झाली?, तिने एवढ्या टाेकाचा निर्णय का घेतला? यामुळे तिचे कुटुंबीय चक्रावले आहेत. गायत्रीने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना सायंकाळच्या सुमारास मिळाली. त्यानंतर हे कुटुंब रात्री लातुरात दाखल झाले. गायत्री तशी शालेय जीवनापासून हुशार हाेती. याच गुणवत्तेवर तिला लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला हाेता.

प्राथमिक शिक्षण झाले मंग्याळ जि.प. शाळेमध्ये...

गायत्री इंद्राळे हिचे प्राथमिक शिक्षण सावरगाव (पीर) नजीकच्या मंग्याळ गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ७ वी पर्यंत झाले. ती अभ्यासात हुशार असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी तिला सावरगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला.

दहावीत मिळाविले ९६ टक्क्यांवर गुण...

गायत्रीला इयत्ता दहावी बाेर्ड परीक्षेत ९६ टक्क्यांवर गुण मिळाले हाेते. याच गुणवत्तेवर तिला लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला हाेता. ती सध्याला प्रथम सत्रातील उन्हाळी द्वितीय सत्राची परिक्षा देत हाेती. पहिल्या सत्रातील काही पेपर राहिल्याचे महाविद्यालयाने सांगितले.

घरात काेरडवाहू शेतजमीन, कुटुंबाची स्थिती हालाखीची...

गायत्रीच्या घरची परिस्थिती हालाखीची हाेती. कुटुंबाचा गाडा वडील माेलमजुरी करुन हाकत हाेते. घरात अल्प काेरडवाहू माळरान शेती आहे. खरिप हंगाम घेतल्यानंतर मिळेल तिथे काम करुन त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी धडपड सुरु केली हाेती. विष्णुकांत इंद्राळे यांना तीन मुली, एक मलगा आहे. पहिल्या मुलीचा विवाह झाला. गायत्री तीन नंबरची मुलगी हाेती. घरात ती हुशार असल्याने तिला उच्च शिक्षण देण्याचे वडिलांचे स्वप्न हाेते.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीDeathमृत्यू