शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा

By आशपाक पठाण | Published: March 16, 2024 4:54 PM

राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा.

आशपाक पठाण, लातूर : ग्रामीण भागात आरोग्य सेवेसह शासनाच्या विविध योजनेची आशा स्वंयसेविकांमार्फत अंमलबजावणी करून घेण्याचे काम करणाऱ्या गटप्रवर्तकांच्या मागण्यांना राज्य शासनाने ठेंगा दाखविला आहे. गटप्रवर्तकांना मासिक १० हजार रूपये मानवाढीची घोषणा केलेल्या राज्य शासनाने शासन आदेश काढताना त्यात केवळ १ हजारांची वाढ केल्याने राज्यातील ३ हजार ५०० गटप्रवर्तकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे, त्यांना सध्या मिळणाऱ्या मोबदल्यात निम्मा खर्च तर प्रवास खर्चात जात असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आशांना राज्य शासनाने मासिक ५ हजार वाढ केली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांना महिन्यात कार्यक्षेत्रातील गावांना किमान २५ दौरे, आशांच्या कामाचे नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठका, त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे, तालुका, जिल्हा बैठकांना उपस्थित राहून वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करून घेणे आदी कामांचा ताण असताना त्यांना अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. सध्या गटप्रवर्तकांना जवळपास १३ हजार ५०० मासिक मानधन मिळते, त्यातून निम्मी रक्कम गावभेटीत प्रवासखर्चात जाते, असे असतानाही राज्यातील ३ हजार ५०० गटप्रवर्तकांना राज्य शासनाने १० हजार मानधन वाढीची घोषणा करून अध्यादेश केवळ १ हजार रूपये वाढीचा काढल्याने गटप्रवर्तक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा साकडे...

राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांची तुटपुंज्या मानधनामुळे कसरत असे वृत्त लोकमतने १३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केल्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयातून अवर सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतला. संपकाळात आरोग्यमंत्री १० हजार रूपये वाढीची घोषणा केली. पण प्रत्यक्षात अध्यादेश निघत नसल्याने पुन्हा एकदा आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अध्यादेश काढला त्यात गटप्रवर्तकांना केवळ १ हजार रूपयांची वाढ केली आहे. यासंर्भात महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देऊन गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीची मागणी केली आहे.

आशांपेक्षा गटप्रवर्तकांचे काम अधिक...

आशांचे काम गावात असते, एका गावात किमान दोन ते तीन आशा कार्यरत आहेत. गटप्रवर्तकांना मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावांत दौरे करून आशांना मार्गदर्शन करावे लागते. मिळणारे मानधन प्रवास खर्चात जाते, उदरनिर्वाहासाठी त्यातून शिल्लक राहणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. मग घरगाडा चालविणे, मुलांचे शिक्षण आदी खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :laturलातूरStrikeसंप